सामाजिक

शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखापर्यंत कर्जमाफी-मुख्यमंत्री फडणवीस

बांबवडे : शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत हि कर्ज माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेचा फायदा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यातून ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. याचा राज्यशासनाच्या तिजोरीवर ३४ हजार कोटींचा बोजा पडणार आहे. १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत च्या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे दीड लाख रुपये कर्जापर्यंत चे कर्ज माफ करण्यात आले. दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेमध्ये बसवून त्यावर मार्ग काढण्यात येणार आहे.
दरम्यान राज्यातील विद्यमान मंत्री,माजी मंत्री,राज्यमंत्री,विद्यमान खासदार,माजी संसद सदस्य,विद्यमान आमदार,माजी विधिमंडळ सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, महानगर पालिका सदस्य,केंद्र व राज्यशासनाचे तसेच निमशासकीय संस्था,आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कर्जमाफीसाठी पत्र असणार नाहीत, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!