राजकीयसामाजिक

१ ऑक्टोबर रोजी बांबवडे त स्वाभीमानी ची भात परिषद : श्री भगवान काटे

बांबवडे : १ ऑक्टोबर रोजी दुपारी १.०० वाजता स्वाभिमानी संघटनेच्या वतीने भात परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, शाहुवाडी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या भात परिषदेस उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री भगवान काटे यांनी आज बांबवडे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
या भात परिषदेस स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी श्री काटे पुढे म्हणाले कि,यंदा होणारी भात परिषद हि तिसरी भात परिषद असून यामुळे एकेकाळी केवळ ७०० ते ८०० रुपये क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या भात पिकाला १३०० रुपये दर मिळू लागला आहे. या तिसऱ्या भात परिषदेत भात उत्पादक शेतकऱ्याला निश्चितच फायदा होणार आहे. भात पिका व्यतिरिक्त इतर पिकांबाबत देखील शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल.
यावेळी युवा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष सागर शंभू शेटे म्हणाले कि, भविष्यात लवकरच संघटनेची स्वतःची राईस मिल लवकरच निर्माण होईल.
या पत्रकार परिषदेस रमेश भोसकर, सुरेश म्हाऊटकर, अवधूत जानकर, गुरुनाथ शिंदे, विशाल चौगुले, अजित साळोखे व कार्यकर्ते पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!