राजकीयसामाजिक

वाढीव वीजबिले कमी करण्याची मागणी : जनसुराज्य शक्ती पक्ष

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात जनतेला आलेली वीजबिले भरमसाठ असून, ती कमी करून मिळवीत, अशा आशयाचे निवेदन शाहुवाडी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने विरळे सरपंच कृष्णा पाटील आणि कार्यकर्त्यांनी दिले. शाहुवाडी तहसील चे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी ते निवेदन स्वीकारले आहे.

सध्या कोरोना संक्रमणाचा काळ सुरु आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे रोजगार, व्यवसाय पूर्णत: बंद आहे. अशा काळात तीन महिन्यांचे बिल आले असून, तेही भरमसाठ आले आहे. रीडिंग न घेता, सरासरी पद्धतीने हि बिले आली आहेत, परंतु तरीसुद्धा सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पटीने हि बिले आली आहेत.

या अनुषंगाने हि वीजबिले कमी करून द्यावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर विरळे सरपंच कृष्णा पाटील, सर्जेराव शंकर पाटील, बाळासाहेब पाटील माजी सरपंच सावर्डे, संभाजी साठे, प्रदीप पाटील, सुनील गवळी आदी कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!