राजांच्या चरणांचा प्रत्येक चिरा संवर्धित व्हावा : आधुनिक ध्येयवेड्या तरुणांची गडकोट भ्रमंती
बांबवडे : ज्या राजांनी अवघा महाराष्ट्र घडवला. माणसानं कसं स्वाभिमानान जगावं, हे शिकवलं. आणि कसं स्वाभिमानानं मरावं, हे त्यांच्या छाव्यानं शिकवलं. अशा या दोन छत्रपती म्हणजे थोरले राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि धाकले राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. अशा या दोन राजांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं, म्हणून आज आपण मराठी माणूस म्हणून, दिवस पहात आहोत. अशा या दोन महापराक्रमी राजांच्या आठवणी जपताहेत, महाराष्ट्रातील काही ध्येयवेडे तरुण. राजांच्या प्रत्येक गडावर त्यांच्या आठवणींचं पुष्प वाहिलं गेलं पाहिजे, याच ध्येयाने या तरुणांनी तब्बल १५ ते १६ गडांवर जावून, एकाच दिवशी वेगवेगळ्या तरुणांनी दसऱ्याचा विजयी दिवस त्यांच्या आठवणींना जपून साजरा केला. ३५० वर्षांपूर्वी जो उत्साह होता.त्याचं उत्साहात दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनाचं तोरण सजलं. त्या आईचा सोहळा आज पुन्हा एकदा संपन्न झाला. ज्या तरुणांनी हे साकारलं, अशाच ध्येयवेड्या तरुणांची हि कहाणी आहे.
या मुलांनी राज्यातल्या १६ गडांवर जावून राजांच्या चरणी दंडवत घातले. त्यांच्या आठवणींचं पुष्प या दोन राजांच्या चरणी समर्पित केले. राजांच्या आज्ञापत्रात सांगितल्याप्रमाणे, गडकोटांचे महत्व टिकविण्यासाठी, हि तरुण मंडळी झटत आहेत. थोरल्या ,धाकल्या राजांचे चरण ज्या ज्या ठिकाणी पडेल, तो तो चिरा संवर्धित करण्यासाठी या तरुणांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत.
अशा या ध्येयवेड्या तरुणांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. कारण एक ज्योतंच दुसऱ्या ज्योतीला प्रेरणा देते. म्हणून सर्वप्रथम पहिली ज्योत जपून तेवत ठेवली पाहिजे, तरच हा छत्रपतींचा महाराष्ट्र स्वाभिमानाने जिवंत राहील.
तो जिवंत राहावा, म्हणूनच हे शब्द पुष्प आपल्या दोन्ही राजांच्या चरणी समर्पित करीत आहोत.