शेतकऱ्याला एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे – माजी खास.राजू शेट्टी
सरूड प्रतिनिधी : मनगटाच्या बळावर शेतकऱ्यांला एक रकमी एफआरपी मिळवून देवूच, चबरोबर आणखी दोनशे रुपये शासनाकडून घेवू, यासाठीच जयसिंगपूर येथील ऊस परिषदेस शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
सरूड तालुका शाहुवाडी येथील ग्रामपंचायत समोरील पटांगणात ” जागर एफआरपी ” चा या नावाने जाहीर सभा संपन्न झाली. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी जयसिंगपूर इथं होणाऱ्या ऊस परिषदेला निमंत्रण देण्यासाठी या सभेचे आयोजन केले होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी राजू शेट्टी होते.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सुरेश म्हाऊटकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत मिरजकर यांनी केले.
सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना शेट्टी पुढे म्हणाले कि, शेतकरी तरुणांवर जर अन्याय झाला, तर तरुणांच्या हाती केवळ दगडच नाही, तर बॉम्ब सुद्धा हाती देवू, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. विरोधक म्हणत होते कि, राजू शेट्टी तरुणांच्या हाती केवळ दगड देतात, या वक्तव्याला त्यांनी उत्तर दिले. शेतकऱ्याच्या पायातील पायतान ताठ आहे, म्हणून तुम्ही एक रकमी एफआरपी द्यायला तयार झाला आहात. वाढलेली एफआरपी केवळ कागदावरच राहिली आहे. द्र आणि राज्य शासनाने मिळून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ढलेली एफआरपी ऊस तोडणी, वाहतूक यांच्यामध्येच खर्च होते. कारण गेल्या चार वर्षात उसाच्या उत्पादन खर्चात भयानक वाढ झाली आहे. पेट्रोल, डीझेल च्या किमतीत वाढ झाली आहे. खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. शेतकऱ्याला प्रति टन उसाचा उत्पादन खर्च २१४/- रु. होतो, तर एफआरपी ची रक्कम केवळ ७५/- रु,नी वाढली आहे. यामुळे शेतकऱ्याला ऊस उत्पादन परवडत नाही. साखर कारखान्यांच्या उसाच्या उपपदार्थांना अधिक दाम मिळत आहे.१०० लाख टन साखर निर्यात होवूनही साखर कारखानदारी तोट्यात कशी ? असा ही सवाल शेट्टी यांनी केला.
एफआरपी बरोबरच शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात काटेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. एका उसाच्या खेपेला दीड ते दोन टन ऊसाची काटेमारी होते. हे रोखण्यासाठी सर्व कारखान्याचे काटे संगणकाने एकत्र जोडले पाहिजेत. काटे ऑनलाईन झाल्याशिवाय या चोऱ्या थांबणार नाहीत. गेल्या दहा वर्षात शेतकऱ्याची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे, ती शेतकऱ्यांच्या या चळवळीच्या जीवावर सुधारली आहे.
यावेळी शेकाप चे भाई भारत पाटील म्हणाले कि, कोविड च्या काळात तरुण बेरोजगार, जगला, तो शेती होती म्हणून जगला. प्रत्येक व्यापारी रोख रकमेवर व्यवसाय करतो, तर शेतकऱ्यांच्या या उत्पादनाला उधारीवर का खरेदी केले जाते. इथं विद्यमान खासदार म्हणतात कि, निष्ठेपेक्षा विकास श्रेष्ठ . तर गेली दहा ते पंधरा वर्षे तुमच्याकडे खासदारकी होती, वेळी विकास का झाला नाही ? या प्रश्नाचे उत्तर खासदारांनी द्यावे, असेही भाई भारत पाटील म्हणाले. जनतेला काहीच कळत नाही अशा भ्रमात सत्ताधाऱ्यांनी राहू नये.
यावेळी राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती अजित पवार, स्वाभिमानी संघटनेचे शिराळा तालुका प्रमुख मानसिंग पाटील, अमर पाटील आदी वक्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी शाहुवाडी – पन्हाळा विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख वसंत पाटील, पद्मसिंह पाटील, अवधूत जानकर, जयसिंग पाटील, काका पाटील , गणेश निकम, आदी मान्यवरांसहित पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
सभेचे आभार वसंत पाटील यांनी मानले.