रत्नागिरी हापूस थेट बागेतून आपल्या घरात – दत्त मँगो सप्लायर्स महेश रवंदे बांबवडे

बांबवडे : मराठी वर्षातील साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे ” अक्षय तृतीया “. या दिवशी या सणाला आंब्याच्या पूजनाने सुरुवात केली जाते. म्हणूनच या शुभ मुहूर्तावर आपल्यासाठी आम्ही ” रत्नागिरी हापूस ” आंबे आणले आहेत, रत्नागिरी हापूस आंबे, तेही होलसेल व रिटेल दरात. यामुळे आपला सणाचा आनंद रत्नागिरी हापूस आंब्यासह द्विगुणीत करा, आणि अक्षय तृतीया सणाचा आनंद लुटा, असे आवाहन दत्त मँगो सप्लायर्स बांबवडे चे मालक श्री महेश रवंदे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना, केले आहे.


एक तरुण पिढी व्यवसायात उतरत आहे. याचा मराठी माणूस म्हणून आपल्याला अभिमान असावा. कारण मराठी लोक व्यवसाय करू शकत नाही, असे काहींचे म्हणणे असते. परंतु महेश रवंदे यांच्या सारखी तरुण पिढी आज व्यवसायात उतरताना पहिली कि, निश्चित अभिमान वाटतो. त्यामुळे या तरुणाईला सहकार्य करणे, हे एक मराठी माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे.
सध्याच्या व्यवहारात दुप्पट नफा मिळवण्यासाठी हापूस आंब्यामध्ये देखील फसवणूक केली जाताना पहायला मिळात आहे. परंतु आपल्या इथं मात्र अशी कोणतीही फसवणूक होणार नाही, याची शंभर टक्के आम्ही खात्री देत आहोत. त्याच बरोबर हे आंबे आपल्याला सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले मिळतील. तेही आंब्याचा बागेतून थेट आपल्या कडे .


हे आंबे आपल्याला होलसेल व रिटेल दरात मिळतील. रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आपल्याला फक्त १६००/- रुपये दरात उपलब्ध आहेत. हि आंब्याची पेटी आपल्याला तीन डझन, पाच डझन, आंब्यांची असू शकते. त्याचबरोबर एक डझन आंबे आपल्याला फक्त ५५०/- रुपये डझन या भावात उपलब्ध आहेत.
अधिक माहिती साठी महेश रवंदे यांच्याशी ९९२३४३१०१८ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन देखील श्री महेश रवंदे यांनी केले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!