सामाजिक

यंदा ऊस उत्पादन घटण्याची शक्यता : पाऊस लांबल्याचा परिणाम

शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर): यंदा पावसाने दिलेल्या ओढीमुळे पुढील हंगामात ऊसाचे उत्पादन घटनाची शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे ३० ते ४०% उत्पादन घटणार असल्याने, साखर कारखान्या पुढे ऊसाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.


यंदाच्या पावसाळ्यात तब्बल दीड महिना पाऊस लांबण्याचा परिणाम ऊस पिकाच्या वाढीवर होणार आहे. तसेच आज अखेर अवघा १०० हेक्टर रोज ऊसाची लावण झाली आहे. गेल्या एक महिन्यानंतर सांगली जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. अजून खरीप पिकांना अपेक्षित असा पाऊस सुरू झालेला नाही. परिणामी यंदा ऊस पिकांची वाढ झालेली नाही. यंदा एप्रिल, मे व जून महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे नद्या तसेच विहिरीचे पाणी आटले होते. त्यामुळे ऊस पिकाला पाणीपुरवठा कमी प्रमाणात झाला आहे. उसाची वाढ झाली नाही. त्यामुळे ऊसाची ३० ते ४०% उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी पुढील वर्षाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांना ऊसाचा तुटवडा भासण्याचा धोका निर्माण झाला आहे. .गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यात सुमारे एक लाख ८८ हजार ९० हेक्टर क्षेत्रावरती ऊस लावण केली आहे. हा ऊस यंदाच्या काळात हंगामासाठी उपलब्ध असणारा आहे. यंदा ऊसाच्या लागवडीसाठी सर्वसाधारण एक लाख ८६ हजार २१५ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. मात्र आतापर्यंत केवळ शंभर हेक्टर क्षेत्रावर अडसाली लावण झाली आहे.


केवळ ४०%च पेरण्या झाल्या असून, खरीपा च्या पेरण्या ही खोळंबल्या आहेत .जुलैचा पहिला आठवडा लोटला तरी, पावसाचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ३५ ते ४०% एवढाच खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात खरीपाच्या सुमारे ९०% पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!