राजकीयसामाजिक

त्यावेळी तुमची भावनिकता कुठे होती- श्री कर्णसिंहगायकवाड

बांबवडे :सध्या महायुतीचे उमेदवार तालुकावासीयांना भावनिक साद घालत आहेत. मी तालुक्यातील उमेदवार आहे. परंतु जेंव्हा आमदार संजयदादा याचं निधन झालं होतं तेंव्हा जनतेने साद घातली होती. कि, तत्कालीन उमेदवार संजीवानिदेवी गायकवाड यांच्या विरोधात आपला अर्ज भरू नका. परंतु तुम्ही त्यावेळी कोणाचेही न ऐकता माजी आमदार बाबासाहेब पाटील दादांचा अर्ज भरलात. त्यावेळी तुमची भावनिकता कुठे फेली होती. त्यामुळे तालुकावासियांनी त्यांच्या भावानिकातेमध्ये न गुरफटता महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना, त्यांच्या नावासमोरील धनुष्यबाण या चीन्हासामोरील बटन दाबून त्यांना मतदान करा. असे आवाहन गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी केले.


करंजफेण तालुका शाहुवाडी इथं महायुती चे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.
श्री कर्णसिंह गायकवाड पुढे म्हणाले कि, त्यावेळी स्व.आमदार संजयदादा हे तालुक्याचे नव्हे तर सगळ्या जिल्ह्याचे लाडके व्यक्तिमत्व होते. तुम्हाला जर त्यावेळी भावनिकता कळली नसेल. तर आत्ता जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न करण्यात काय हशील आहे. जर देशाची अस्मिता जपायची असेल, देश महासत्ता बनवायचा असेल , तर पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणे, हि काळाची गरज आहे. त्यासाठी आपाल्याला धैर्यशील माने यांना निवडून देणे गरजेचे आहे. ते तुम्ही कराल याची आम्हाला खात्री आहे, असेही श्री कर्णसिंह यांनी यावेळी सांगितले.


यावेळी जनसुराज्य पक्ष, भाजप तसेच संजयदादा गटावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी बांधक्म सभापती सर्जेराव पाटील दादा, बाबा लाड, भाजप चे तालुकाध्यक्ष पांडुरंग वग्रे आबा, सुरेश नारकर बापू आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!