स्वाभिमानाने विजयाची गुढी उभी करू या- श्री राजू शेट्टी
बांबवडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानाने विजयाची गुढी उभी करू या, आणि सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देवू या, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार, व यंदाचे खंदे उमेदवार श्री राजू शेट्टी यांनी मतदारसंघातील जनतेला केले आहे. तसेच मतदारसंघातील व महाराष्ट्रातील जनतेला नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी बोलताना श्री राजू शेट्टी म्हणाले कि, महाविकास आघाडीशी चर्चा करताना मशाल चिन्हावर लढण्याचा आग्रह धरण्यात आला होता. परंतु मी माझ्या शेतकरी बांधव , कष्टकरी जनता आणि ज्यांनी मला एक व्होट आणि एक नोट देवून, या मतदारसंघात स्वाभिमानाने आणले त्या मतदारसंघाशी मी प्रतारणा करणे, हे विश्वासाला धरून होणार नाही. म्हणून एक वेळ आघाडीचा पाठींबा नाही मिळाला तरी चालेल, कारण माझी जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तेंव्हा मी लढणार आणि जिंकणारही, असा आशावाद माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.