राजकीयसामाजिक

निवडणूक गावकीची ना भावकीची हि निवडणूक देशाच्या अस्मितेची – आमदार डॉ. विनय कोरे

बांबवडे : लोकसभा २०२४ ची निवडणूक, हि गावकीची नाही, कि भावकीची नाही. हि निवडणूक देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी ची आहे. याकरिता शिवसेना शिंदे गटाचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या धनुष्यबाण चीन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. असे आवाहन शाहुवाडी पन्हाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले आहे.


भाडळे, व्हारकटवाडी , खुटाळवाडी, बांबवडे पंचक्रोशी आणि शाहुवाडी तालुका प्रचार दौरा आटोपून चरण तालुका शाहुवाडी इथ घेण्यात आलेल्या कोपरा सभेत आमदार डॉ. विनय कोरे यांनी तालुकावासीयांना आवाहन केले आहे. यावेळी चरण ग्रामस्थांच्या वतीने आमदार कोरे. यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी डॉ. कोरे पुढे म्हणाले कि, एक काळ असा होता, कि शेजारील पाकिस्तान वारंवार भारताच्या कुरापती काढत होते. आणि आपल्याला नामोहरम कारण्याचा प्रयत्न करत होते. ज्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाची सूत्रे हातात घेतली, त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. पाकिस्तान ने अजमल कसब सारखे अतिरेकी मुंबई वर पाठवून आपल्या अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शहीद होण्यास भाग पाडले. अनेक अधिकारी या चकमकीत धारातीर्थी पडले. या गोष्टी एक भारतवासी म्हणून आपण सहन करू शकत नाही. अनेक वेळा मुंबई, पुणे सारख्या शहरात बॉम्बस्फोट घडवून सामान्य जनतेला यमसदनी पाठवले. या गोष्टी आपण सहन करू शकत नाही. अशा वेळी श्री मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक घडवून पाकिस्तान ला जशास तसे उत्तर दिले. पुलवामा प्रकरणात पाकव्याप्त कश्मीर मध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. युक्रेन आणि रशिया च्या युद्धात आपले भारतीय विद्यार्थी अडकले होते. त्यावेळी आपली आंतरराष्ट्रीय नीती वापरून काही तासांकरिता युद्ध थांबविण्यास भाग पडले, आणि आपले विद्यार्थी सुखरूप मायदेशी आणले. हि ताकद पंतप्रधान मोदी यांनी जागतिक बाजारपेठेत निर्माण केली आहे. म्हणूनच देशाला जर महासत्ता बनवायचे असेल, तर श्री मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुती चे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून आणून देशाप्रती आपली असलेली निष्ठा दाखवून द्यावी, असेही श्री विनय कोरे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी गोकुळचे संचालक श्री कर्णसिंह गायकवाड म्हणाले कि, आपल्या मतदारसंघात चांगले घडवायचे असेल तर सावकर साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून धैर्यशील माने यांना त्यांच्या धनुष्यबाण या चीन्हासामोरील बटन दाबून विजयी करावे.


यावेळी बाजारसमिती चे माजी सभापती बाबा लाड यांनी प्रास्ताविकपर भाषणात तालुक्यात झालेल्या विकास कामांची माहिती दिली.
यावेळी जनसुराज्य पक्षाचे सर्जेराव पाटील दादा, रंगराव खोपडे, काळू पाटील, भाजप चे तालुकाध्यक्ष पांडुरंग वग्रे, बांबवडे चे सुरेश नारकर बापू,स्वप्नील घोडे-पाटील, धनाजी माने, शंकर बारगीर, विजयसिंह देसाई सरकार, महादेव पाटील, विष्णू पाटील, माजी सरपंच विष्णू यादव, सयाजी निकम, पांडुरंग निकम, सागर कांबळे, खुटाळवाडी, येथील संजयदादा गटाचे सर्व कार्यकर्ते, तसेच सावक्रर प्रेमी जनता, धैर्यशील माने यांचे शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!