सामाजिक

अवघी पंढरी अवतरली- माजी आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर


बांबवडे : आपल्या दुःखाचा सामान्य माणसाला विसर पडावा, म्हणून जनता एका अद्भुत शक्ती ला विनवीत असते, कि, हे दिवस सुसह्य होण्यासाठी आम्हाला शक्ती दे. ती अद्भुत शक्ती म्हणजे परमेश्वर असते. त्याला विनविण्यासाठी भजन ,कीर्तन यांच्या माध्यमातून परमेश्वराला आळवले जाते. आणि त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मृदुंग, सूरपेटी, आणि टाळ. या साहित्याचे वाटप करून श्री विजयराव बोरगे यांनी एक प्रकारे सामान्य जनता आणि परमेश्वर यांचे मिलन करण्यासाठी ते स्वत: एक सेतू बनले. खरोखरच हा उपक्रम संपन्न करून, त्यांनी साळशी विद्यामंदिराच्या पटांगणात अवघी पंढरी उभी केली. असे मत माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी व्यक्त केले.
साळशी तालुका शाहुवाडी येथील साळशी विद्यामंदिर इथं, एक आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला. पिशवी जि.प. मतदार संघातील २२ गावांमधील भजन व कीर्तन करणाऱ्या वारकरी मंडळींना टाळ,पखवाज,आणि सूरपेटी असे साहित्य वाटप केले. आणि अवघा वारकरी सांप्रदाय भरून पावला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व उदय साखर कारखान्याचे चेअरमन श्री मानसिंगराव गायकवाड दादा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री सत्यजित पाटील पुढे म्हणाले कि, सामान्य जनतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असते. त्यासाठी माळ घालणे, आहार बदलणे गरजेचे नसून, त्यांच्यासाठी कहीतरी करणे गरजेचे आहे, आणि हे विजयराव बोरगे यांनी केले आहे. एका सात्विक आनंदाचा उपभोग जनतेला मिळावा, यासाठी त्यांनी आरंभलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर त्यांनी येथील ज्ञानाचे मंदिर म्हणजे शाळा देखील सुसज्ज केली आहे. त्यांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाबद्दल त्यांचे मनापासून आभार. असेही माजी आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर यांनी सांगितले.
यावेळी श्री मानसिंगराव गायकवाड दादा म्हणाले कि, जि.प.सदस्य विजयराव यांनी या पाच वर्षात मतदारसंघासाठी अनेक विकास कामे आणली आहेत. त्यांचे कर्तुत्व निश्चितच वाखाणण्यासारखे आहे. भविष्यात आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी आहोत.
यावेळी माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू म्हणाले कि, असला आगळा वेगळा कार्यक्रम कोणत्याही सदस्याने घेतलेला नसून,या हसतमुख व्यक्तिमत्वाचे निश्चितच कौतुक आहे.
यावेळी वारकरी सांप्रदाय च्यावतीने विजयराव बोरगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना बोरगे म्हणाले कि, सध्या तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळत आहे. त्यांनी व्यसनाच्या आहारी न जाता सात्विकतेचा मार्ग स्वीकार करावा, वारकरी सांप्रदाय कडे वळावे, हा त्यामागील प्रामाणिक हेतू आहे. म्हणूनच दहा टाळ, एक पखवाज, एक सूरपेटी अशा साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बांबवडे महिला भजनी मंडळ, सुपात्रे, पिशवी, वाडीचरण महिला भजनी मंडळ, थेरगाव क्र.१, थेरगाव क्र.२, घुंगुर, सावरेवाडी, घुंगुरवाडी, शित्तूर तर्फ मलकापूर, गुजरवाडी, तळपवाडी, सावे, मोळावडे, भैरेवाडी, गमेवाडी, सोनवडे, परखंदळे, नांदगाव, गोगवे, डोणोली, परळी, चरण, साळशी आदी गावांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री महादेवराव ज्ञानदेव पाटील साळशीकर, करवीर विभागाचे माजी सभापती प्रदीप झांबरे, रणवीरसिंग गायकवाड, आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी शाहुवाडी पंचायत समिती च्या सभापती सौ लतादेवी पाटील, उपसभापती पांडुरंग पाटील, माजी सभापती श्री विजयराव खोत, श्री गंगाधर बोरगे, के.एन. लाड, साळशी चे सरपंच संदीप पाटील, प्रकाश पाटील, सुभाषराव बोरगे, जालिंदर पाटील, बाळासाहेब खुटाळे, गोगवे सरपंच विकास पाटील,उदय साखर चे एम.डी. भगवान पाटील, आनंदराव पाटील, संजय पाटील मिस्त्री, बांबवडे उद्योगपती तानाजी चौगुले महाराज, अभयसिंह चौगुले,अविनाश जगताप,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!