राजकीयसामाजिक

खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत विकासकामे पोहचवणार- श्री अभयसिंह चौगुले

बांबवडे : बांबवडे पंचायत समिती मतदारसंघात पंचायत समिती च्या माध्यमातून अनेक विकास कामे सर्व सामान्य जनतेच्या उंबऱ्यापर्यंत पोहचवणार आहोत. केवळ आपले नातेवाईक आणि मित्र यांच्यापर्यंत विकास मर्यादित न राहता, गरजवंतांपर्यंत पोहचवल्याशिवाय राहणार नाही. असे मत बांबवडे पंचायत समिती चे उमेदवार अभयसिंह चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

आज दि.३ फेब्रुवारी २०२६ रोजी उमेदवारांची पदयात्रा बांबवडे गावातून निघाली. यावेळी ते बोलत होते.

विकास हा सर्व सामान्य नागरिकांचा अधिकार आहे. तो त्यांच्यापर्यंत पोहचवणे हे पंचायत समितीचे सदस्य यांचे कर्तव्य आहे. परंतु बऱ्याचवेळा खऱ्या गरजवंतांपर्यंत अनेक योजना पोहचत नाही. कधीकाळी अधिकारी तर कधी राजकारण यामुळे खरा लाभार्थी लाभापासून वंचित राहतो. परंतु आम्ही दोन्ही उमेदवार पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद च्या माध्यमातून येणाऱ्या योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहचवल्याशिवाय राहणार नाही. आरोग्य सुविधा, तसेच शेतीसाठी गरजेचे असलेली बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणार आहोत. तसेच शेतीसाठी सवलतीच्या दरात मिळणारी शेतीचे औजारे सुद्धा त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत.  येथील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविणे, हे सुद्धा आमचे कर्तव्य आहे.

यासाठी जिल्हा परिषद च्या उमेदवार सौ राजकुंवर रणवीरसिंग गायकवाड, व माझ्या घड्याळ चीन्हासामोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावे, अशी आपल्याला विनंती आहे. असे सुद्धा श्री अभयसिंह चौगुले यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!