छाती अभिमानाने फुगली,आणि डोळ्यांच्या पाण्याला महापूर आला : कारगिल विजयी दिन
बांबवडे : आजचा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. कारण याचदिवशी बर्फाच्छादित वातावरणात आपल्या जवानांनी जीवाची बाजी लावली आणि टायगर हिल पुन्हा हिसकावून घेतला. २६ जुलै १९९९ हा दिवस पुन्हा एकदा रक्तरंजित इतिहासाने लिहिला गेला. आणि प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगली,आणि डोळ्यांच्या पाण्याला महापूर आला. असा हा दिवस आपण कारगिल विजयी दिवस म्हणून साजरा करतो.
याचदिवशी अनेक मातांची कूस उजाडली,अनेक भगिनीची कपाळे पांढरी झालीत. अनेक पित्यांचा भविष्यातील आधार सुटला. कारण याचदिवशी अनेक जवानांनी बलिदान दिले, आणि आपला तिरंगा हिसकावून घेणाऱ्यांच्या छाताडात पुन्हा रोवून बसविला.
असा हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हायला हवा. या शहीद झालेल्या वीरांना, त्यांच्या वीरमातापित्यांना विनम्र अभिवादन,आणि सह्यादीच्या कड्यांचा मानाचा मुजरा.