जनतेच्या प्रेमामुळेच विजयाचा गुलाल – श्री.रणवीरसिंग गायकवाड सरकार
बांबवडे: माझ्या आयुष्याची सुरुवातच मुळात संघर्षातून झाली. त्यामुळे अनेक पराभव पचवत आलो आहे.तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यात कधी कमी पडलो नाही.म्हणूनच जनतेने अमाप प्रेम केलं आणि विजयाची पताका आमच्या हातात दिली. सर्वसामान्य जनतेला त्रिवार अभिवादन आणि आभार सुद्धा, असे मत कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक श्री.रणवीरसिंग गायकवाड सरकार यांनी व्यक्त केले.बांबवडे ता.शाहूवाडी येथील महादेव मंदिरात जिल्हा परिषद मतदार संघाच्या आभार दौऱ्याची सांगता सभा संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्ष स्थानावरून श्री.रणवीरसिंग गायकवाड बोलत होते.यावेळी बांबवडे जिल्हा परिषद मतदार संघाच्या नूतन सदस्या सौ.राजकुंवर रणवीरसिंग गायकवाड यांचा सन्मान बांबवडे गावच्या नूतन उपसरपंच सौ.मनीषा दिपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रणवीरसिंग गायकवाड सरकार यांचा सन्मान नूतन पंचायत समिती सदस्य भगतसिंग चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.बांबवडे पंचायत समिती गणाचे नूतन सदस्य श्री.अभयसिंह चौगुले यांचा सन्मान श्री.भगवान निकम आप्पा यांच्या हस्ते करण्यात आला..सरूड मतदार संघातील पंचायत समिती सदस्या डॉ.धनश्री पाटील यांचा सन्मान सौ. सुवर्णा दाभोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर डॉ.जयवंत पाटील यांचादेखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


या आभार दौऱ्यावेळी श्री रणवीरसिंग गायकवाड पुढे म्हणाले की,विरोधक ही निवडणूक राजाविरुद्ध प्रजा असे असल्याचे सांगत होते. परंतु ही निवडणूक अहंकार विरुद्ध प्रजा अशीच ठरली आणि त्यामध्ये प्रजेने विजयाचा वाटा आमच्या पदरात टाकला. आणि आमच्या गायकवाड घराण्यावर तसेच सत्यजित आबा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेने आमच्या हातात विजयी पताका दिली. त्यामुळे विरोधकांना ही फार मोठी चपराक आहे. ज्यांना आपला पराभव पचवता येत नाही, त्यांनी राजकारणात उतरता कामा नये.कारण पराभव झाल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. लोकांचं पाणी बंद करण्यात आलं. परंतु सर्वसामान्य जनता त्याही परिस्थितीत डगमगली नाही आणि सौ राजकुंवर गायकवाड तसेच अभयसिंह चौगुले व लक्ष्मी पाटील यांना भरघोस मतांनी विजयी केले,ही फार मोठी बाब आहे. यासाठी माता भगिनींनी फार मोठा सहभाग घेतला होता.तसेच कारखाना कर्मचारी,ग्रामस्थ,तरुण या सगळ्यांचाच वाटा या विजयामध्ये आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजकुंवर रणवीर सिंग गायकवाड म्हणाल्या की बांबवडे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वच जनतेने गायकवाड घराण्यावर तसेच सरूडकर घराण्यावर प्रेम करत माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास मी सार्थ केल्याशिवाय राहणार नाही. त्यातल्या त्यात बांबवडेकरांनी खूपच माझ्या निवडणुकीत मेहनत घेतली आणि विजय खेचून आआणला , त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. बांबवडे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वच कामे विकास कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.आपण कधीही मला संपर्क साधू शकता आणि मी तुमच्यासोबत निश्चितच थांबेल अशी ग्वाही सौ राजकुंवर रणवीर सिंग गायकवाड यांनी या आभार दौऱ्याच्या सांगता सोहळ्याप्रसंगी दिली.
यावेळी बांबवडे पंचायत समिती गणाचे नूतन सदस्य श्री अभयसिंह चौगुले म्हणाले की, या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने आमची बाजू उचलून धरली आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला तो निश्चितच आम्ही सार्थ करून परंतु याचवेळी विरोधकांना मात्र त्यांना त्यांचा पराभव पचवता आला नाही, म्हणून जी पाणी योजना सुरू होती ती पाणी योजना स्वतःच्या मालकीची असल्यासारखे वागत, त्यांनी काही शेतकऱ्यांचं पाणी बंद केलं. परंतु या गोष्टींना न घाबरता इथल्या सर्वसामान्य वर्गाने इथल्या शेतकऱ्याने आमच्यावर विश्वास दाखवला आणि कोणत्याही आमिषाला आणि धमकीला बळी न पडता आम्हाला मतदान केले,याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानत आहे आणि भविष्यात त्यांच्या कोणत्याही आणि अडचणीसाठी निश्चित धावून जाऊ. त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या शासकीय योजना आहेत, त्या सर्वच योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत.

यावेळी बांबवडे गावचे लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांनी नूतन पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्य यांचे अभिनंदन केले आणि ते पुढे म्हणाले की बांबवडे गावाबाबत नेहमीच शंका उपस्थित केली जात होती की बांबवडे गावातून मतदान फार मोठ्या प्रमाणात होणार नाही किंबहुना विरोधक जास्त मतदान आपल्या बांबवडे गावातून घेतील अशी शंका होती. परंतु बांबवडेकरांनी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या निवडणुकीत आपल्या कष्टाची पराकाष्टा केली आणि बांबवडे मध्ये फक्त आठच मत विरोधकांना अधिक झाली.अन्यथा बांबवडे करांनी आपली मते आपल्या जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य यांच्या पारड्यात टाकून निश्चितच या मतदारसंघाचा गौरव केला आहे.
यावेळी रणवीरसिंग गायकवाड गटाचे खंदे समर्थक असलेले श्री दिलीप बंडगर यांनी आपल्या रांगड्या भाषेत आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्या मनोगतातून त्यांनी रणवीर सिंग गायकवाड यांना आश्वस्थ केलं की, नेहमीच तुमच्या पाठीशी राहू. प्रत्येक प्रसंगात आम्ही आपल्या पाठीशी राहू आणि निश्चितच या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कार्यकाळात आपल्या सोबत असू, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान सुपत्रे ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य चौगुले यांना सर्वाधिक मते देऊन त्यांचा विजय साकार केला. याबद्दल बांबवडे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे तसेच सरपंच संदीप पाटील यांचे देखील आभार मानण्यात आले. यावेळी भीमराव कांबळे यांनी जिल्हा परिषद सदस्या राजकुंवर गायकवाड तसेच अभयसिंह चौगुले तसेच धनश्री पाटील यांचा सत्कार केला. त्यानंतर श्री बाळासाहेब पाटील तसेच गणेश पाटील या पिता पुत्रांनी देखील या नूतन सदस्यांचा सन्मान केला. याचबरोबर संभाजी बंडगर यांनी देखील या सर्वच नूतन सदस्यांचा सत्कार केला.या कार्यक्रम प्रसंगी गावचे अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामध्ये श्री भगवान निकम आप्पा, श्री जयसिंग निकम तात्या ,श्री बजरंग आत्तरकर, श्री विलास निकम आप्पा, श्री धर्मेंद्र कांबळे साहेब, श्री.दीपक निकम ,सौ.सुवर्णा दाभोळकर,सौ.सीमा निकम ,बांबवडे गावच्या उपसरपंच सौ.मनीषा दीपक पाटील तसेच दीपक पाटील , संजय निकम ,मुकंद प्रभावळे, शरद निकम,सागर चौगुले ,अमर निकम , अरुण निकम ,सचिन निकम ,याबरोबर अनेक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
यावेळी रणवीर सिंग गायकवाड गटाचे खंदे समर्थक असलेले श्री दिलीप बंडगर यांनी आपल्या रांगड्या भाषेत आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्या मनोगतातून त्यांनी रणवीरसिंग गायकवाड यांना आश्वस्थ केलं की नेहमीच तुमच्या पाठीशी राहू. प्रत्येक प्रसंगात आम्ही आपल्या पाठीशी राहू आणि निश्चितच या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कार्यकाळात आपल्या सोबत असू.
यावेळी आभार प्रदर्शन करताना दैनिक सकाळचे पत्रकार अमर पाटील म्हणाले की अनेकांनी कारखाना कामगारांवर शंका उपस्थित केली होती. परंतु कारखाना कारखान्याचे कारखान्याचा प्रत्येक कामगार हा आपल्या गटाशी,आपल्या नेत्याशी प्रामाणिक राहिला आणि त्यामुळेच हा विजय साकार झाला,असेही श्री.अमर पाटील यांनी सांगितले.त्याचबरोबर त्यांनी मंचकावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचे आणि कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद पवार यांनी केले.