तालुक्यातील सडलेले विजेचे खांब न बदलल्यास वीज कार्यालयाला टाळे ठोकणार – मनसे
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : शाहुवाडी तालुक्यात वीज वितरण कंपनी चा गलथान कारभार वारंवार दृष्टोत्पतीस येतो. तालुक्यात अनेक गावात विजेचे खांब सडलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. याची दुरुस्ती पावसाळ्या अगोदर न झाल्यास, वीज वितरण कार्यालयास टाळे ठोकून मनसे स्टाईल ने उत्तर दिले जाईल. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मलकापूर चे शहराध्यक्ष अजय गुरव आणि कार्यकर्ते यांनी वीज वितरण कंपनीला दिले आहे. सदरचे निवेदन वीज वितरण कंपनीचे उपभियांता शाम राज यांनी स्वीकारले.

या निवेदनात पुढे नमूद केले आहे कि, नुकतीच तालुक्यातील शित्तूर तर्फ वारुण येथील कदम कुटुंबियांची जि वित्त हानी झाली आहे, त्यास वीज वितरण कंपनी जबाबदार आहे. अशाच पद्धतीने तालुक्यातील अनेक गावात विजेचे खांब सडले आहेत . यामुळे कोठेही विजेचे खांब कोसळून जीवितहानी , तसेच वित्त हानी होवू शकते. म्हणूनच वीज कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी यांची गंभीर दखल घ्यावी. सडलेले खांब त्वरित बदलण्यात यावेत. येत्या ३० दिवसांच्या आत हि कामे होणे , गरजेचे आहे, असे न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या शाहुवाडी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा देखील या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

यावेळी मनसे सहकार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश तांदळे, प्रवीण कांबळे, आदी कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.