educationalसामाजिक

धावपळीच्या काळात ज्ञानाबरोबर कौशल्य गरजेचे- प्रा. डॉ. एच.एस. वनमोरे


मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : मोबाईल व टीव्ही हि साधनांचा प्रभाव सध्या वाचन संस्कृतीला खीळ घालत असल्याचे दिसून येत आहे. याचा दूरगामी परिणाम विद्यार्थी वर्गावर होण्याची मोठी भीती वाटत आहे. वाचनामुळे प्रगल्भता, माणुसकी, ज्ञान ,स्वावलंबन यांचे भान येते. आजच्या काळात ज्ञानाबरोबर कौशल्य असणे महत्वाचे झाले आहे. असे मत प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी समन्वयक प्रा. डॉ.एच.एस. वनमोरे यांनी केले.


ते मलकापूर तालुका शाहुवाडी येथील पेरीड च्या प्रा.डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय इथं राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी.एन. घोलप होते.


आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले कि, राष्ट्रीय सेवा योजनेमुळे नेतृत्व गुण व विविध कलांना संधी मिळते. तसेच खऱ्या अर्थाने जिवन प्रणाली कळते. याचबरोबर समाजाची सेवा करण्याची नामी संधी मिळते. कालानुरुप विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे. आपल्या जीवनात प्रकाश यावा असे वाटत असेल, तर धावपळ करावीच लागते.


आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य टी.एन. घोलप म्हणाले कि, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे अनन्यसाधारण महत्व आहे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सचिन चव्हाण यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.एन.एम. पाटील यांनी करून दिला.


यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती फडतरे एस.एस. यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ.एन.एस. आडनाईक यांनी मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!