नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रु. अनुदान द्यावे,अन्यथा क्रांतीदिनी आंदोलन- श्री.राजू शेट्टी
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून, जे शेतकरी नियमितपणे कर्ज परतफेड करतात, त्यांना ५०,०००/- रु. अनुदान द्यावे, अन्यथा ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उग्र आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शासनाला या आक्रोश मोर्चात दिला.

अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत असताना, जि मंडळी नियमित कर्ज परतफेड करतात, त्यांचे काय ? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात होता. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.