राजकीयसामाजिक

निर्मिती आणि सेवा हाच खरा “वसा” –सौ राजकुंवर गायकवाड

बांबवडे :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये आमच्या गायकवाड घराण्यातील पूर्वजांनी आपले रक्त सांडले आहे. त्या गायकवाड घराण्याचा निर्मिती आणि सेवा हा वसा आणि वारसा पुढे घेवून आम्ही चालणार आहोत. यासाठी तुमच्या मतरूपी आशीर्वादाची गरज आहे. मी बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील  उर्वरित विकास साधण्यासाठी बांधील आहे. असे मत सौ. राजकुंवर रणवीरसिंग गायकवाड यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

बांबवडे जिल्हापरिषद मतदारसंघात घड्याळ या चिन्हावर त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. स्व. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माझी उमेदवारी आहे. दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत. पण त्यांची शेतकऱ्यांची सेवा आणि बेरोजगारीला तिलांजली देण्याचे स्वप्न, असे अनेक मुद्दे या निवडणुकीत आले आहेत.

यावेळी सौ गायकवाड पुढे म्हणाल्या कि, आजवर गायकवाड घराण्याने प्रामाणिकपणे शेतकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या आरोग्यासाठी बांबवडे येथील आरोग्यवर्धीनीला सुरुवातील सौ शैलजादेवी गायकवाड यांच्या जिल्हापरिषद फंडाच्या माध्यमातून नवीन इमारतीला  निधी आणला होता. इथं डॉक्टरांची  वाणवा होती. त्याकाळात दोन वैद्यकीय अधिकारी आणण्याची सुविधा आपण उपलब्ध केली.

या मतदारसंघातील बेरोजगार युवकांना त्यांच्या पाठीशी उभे राहून जिल्हा बँकेच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. जेणेकरून तो युवक विविध उद्योगाच्या  माध्यमातून चार पैसे कमवू  लागेल, आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उपयोग होईल.

या मतदारसंघात तालुक्यातील एकमेव असलेला औद्योगिक प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु आहे. इथे अनेक तरुणांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. ऊस उत्पादनाच्या माध्यमातून पशुपालन सारखा दुय्यम व्यवसाय उपलब्ध करून दिला गेलं आहे.

आण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून तरुणांना इतर व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

अशी अनेक विकासकामे या मतदारसंघात जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड सरकारांच्या माध्यमातून झाली आहेत. यापुढेसुद्धा अनेक विकासकामांची यादी आपल्याकडे आहे. हि सर्वच कामे राष्ट्रवादी च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देवून आपण पूर्ण करून देणार आहोत.

यावेळी श्री रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, स्वराज्य निर्मितीसाठी आमच्या पूर्वजांनी नेसरीच्या रणसंग्रामात आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. त्या बहिर्जी गायकवाडांचे आम्ही थेट बारावे वंशज आहोत. दिला शब्द मोडणार नाही. यासाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. इथला तरुण बेरोजगार राहणार नाही. यासाठी जीवाचे रान करू. यासाठी या मतदारसंघात जिल्हापरिषद साठी  सौ राजकुंवर रणवीरसिंग गायकवाड, पंचायत समिती साठी श्री अभयसिंह बाळासाहेब चौगुले, व सौ लक्ष्मी बाबुराव पाटील  या उमेदवारांच्या घड्याळ या चीन्हासामोरील बटन  दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. हीच स्व. अजितदादांना श्रद्धांजली ठरेल, आणि नेसरीच्या रणसंग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना ठरेल, असे मत  जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले..

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!