नुकसान भरपाई वरून आवळी इथं खून : दरम्यान दोघे जखमी
बांबवडे : नुकसान भरपाई च्या वाटणी वरून आवळी तालुका पन्हाळा येथे काल दि.१३ मार्च रोजी रात्री साडे नऊ वाजणे च्या सुमारास खून झाला आहे. याची नोंद कोडोली तालुका पन्हाळा येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर च्या घटनास्थळास शाहुवाडी चे पोलीस उप विभागीय अधिकारी यांनी भेट दिली आहे. प्रकरणाचा तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पवार करीत आहेत. आरोपी अद्याप फरार असल्याचे समजत आहे.

सदर घटनेची फिर्याद भगवान महादेव पाटील वय ४० वर्षे राहणार आवळी पैकी पोवार वाडी तालुका पन्हाळा यांनी प्रवीण सुभाष पाटील, प्रदीप विश्वास पाटील, विश्वास बाबुराव पाटील तिघेही राहणार आवळी पैकी पोवार वाडी, दिलीप शामराव गराडे राहणार पैजारवाडी तालुका पन्हाळा यांच्याविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात दिली आहे.

सदर घटनेची पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, फिर्यादी व आरोपी यांची घरे समोरासमोर आहेत. फिर्यादी व आरोपी यांची शेती गट क्र. ७४१ (अ) यामधील जमीन शासनाने अधिगृहित केली आहे. त्याची नुकसान भरपाई फिर्यादी व आरोपी यांना मिळाली आहे. परंतु सदर च्या नुकसान भरपाई च्या वाटणीवरून गेले पंधरा दिवस त्यांच्यात वाद सुरु होता.

काल दिनांक १३ मार्च रोजी सायंकाळी फिर्यादी हे आपल्या घरासमोर हातपाय धूत होते. दरम्यान प्रवीण सुभाष पाटील यांनी फिर्यादीला म्हणाले कि, मी तुला परवाच मारणार होतो, पण तू वाचलास, आता तुला सोडत नाही. असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नुकसान भरपाई च्या वाटणीवरून, झालेल्या वादातून सर्वच आरोपींनी फिर्यादीला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान फिर्यादी ची पत्नी व मामा हे सोडविण्यासाठी गेले. यावेळी मामा रघुनाथ ज्ञानू पोवार यांना चार हि आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा खून केला. दरम्यान विश्वास बाबुराव पाटील याने फिर्यादीच्या घरावर दगड मारण्यास सुरुवात केली. आणि दरवाजा तोडून घरातील फिर्यादी चा मुलगा प्रतिक याला दगडाने मारहाण केली. त्या मारहाणीत प्रतिक जखमी झाला या मारहाणीत फिर्यादी व प्रतिक हे दोघे जखमी झाले आहेत..

सदर घटनेचा तपास कोडोली पोलीस ठाणे करीत असून, आरोपी अद्याप फरार आहेत.