पुढारी चे विशाळगड प्रतिनिधी सुभाष पाटील यांना आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा परिषद च्यावतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार शाहुवाडी तालुक्यात शिरगाव येथील दैनिक पुढारी चे पत्रकार व विशाळगड प्रतिनिधी श्री सुभाष पाटील यांना प्राप्त झाला आहे. शाहुवाडी तालुका पत्रकार संघ, शाहुवाडी प्रेस क्लब, साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज या सर्व पत्रकारांच्या वतीने श्री सुभाष पाटील यांचे हार्दिक अभिनंदन.

हा पुरस्कार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, व जिल्ह्याचे पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

सुभाष पाटील हे गेली अनेक वर्षे पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक सामाजिक विषयांना त्यांनी वाचा फोडली आहे. तर अनेक सामाजिक प्रश्न शासनाच्या ऐरणीवर आणून, सोडवण्यात त्यांचा चांगलाच वकूब आहे. केवळ ओळखपत्र गळ्यात घालून न मिरवता, प्रत्यक्ष अनेक विषय मांडण्यात ते नेहमीच गर्क असतात. त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय वर्तुळात त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला आहे. वस्तुनिष्ठ आणि लोकोपयोगी लेखन करून ग्रामीण पत्रकारितेला त्यांनी एक नवा आयाम मिळवून दिला आहे.त्यांच्या या व्यासंगी कार्याचा गौरव म्हणून त्यांना यंदाचा तालुकास्तरीय आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात आला आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहात राजर्षी शाहू महाराज जयंती चे औचित्य साधून तालुकास्तरावर उत्र्कृष्ठ पत्रकार म्हणून सुभाष पाटील यांना सपत्नीक नामदार हसन मुश्रीफ, सतेज उर्फ बंटी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते रोख पाच हजार रु. व सन्मान चिन्ह देवून समारंभपूर्वक गौरविण्यात आले.

यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनिषा शिंदे – देसाई, जि.प.सदस्य विजय बोरगे, माजी जि.प..स. शशिकांत खोत, अमर पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना, सुभाष पाटील म्हणाले कि, पत्रकारिता हे माझ्यासाठी मिशन आहे. या पुरस्काराने माझ्यावरील सामाजिक जबाबदारी अधिक वाढली असून, माझ्या पत्रकारितेचा उपयोग समाजासाठी यापुढेही करण्यात येईल, असेही सुभाष पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगतिले.