बांबवडे म.गांधी विद्यालयात फुलल्या जुन्या आठवणी : २००८-०९ च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील महात्मा गांधी विद्यालय च्या २००८-०९ सालच्या १० वी च्या बॅच चा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री एन.ए.पाटील सर होते. कार्यक्रमाचे स्वागत अविनाश गावडे यांनी केले. तर प्रास्ताविक विशाल पाटील यांनी केले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री पाटील सर म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला स्नेह मेळावा, कौतुकास्पद आहे. कारण भविष्यात प्रत्येकजण आपापल्या कामधंद्यात व्यस्त होतो. परंतु आपण आपल्या शालेय जीवनात जोडलेली नाती, आणि स्नेह आठवणींच्या गाठोड्यात बंद राहू नये. आपली नाती आयुष्यभर या स्नेह मेळाव्यातून जपली जातात. यावेळी सागर चौगुले सर म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या शाळेत आपल्याला आणले आहे. बालपण एकदा सरले कि, पुन्हा येत नाही. परंतु या स्नेह मेळाव्यातून पुन्हा एकदा आंपण लहान झालो, आणि ते शाळेतील क्षण आपल्यला अनुभवायला मिळाले. हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्त करत, आपली मैत्रीची नाती उलगडली. यावेळी विद्यार्थ्यांना भावना अनावर झाल्या, तर काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कन्हैया कुरणे यांनी केले.तसेच यावेळी विशाल पाटील , अमित कोळेकर, सचिन पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करीत शाळेत अनुभवलेल्या प्रसंगांना अधोरेखित केले.
यावेळी विद्या कांबळे मॅडम, खराडे सर, सपकाळ सर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. तर सागर पाटील, प्रदीप निकम, राहुल डावंग, विक्रम यादव, सुजाता सातपुते, अल्फा पटेल, अर्चना यादव, अर्चना पाटील, अमृत काशीद जीशान आत्तार, विशाल मानकर, रुपाली शिसळ, विशाल कापसे, सनी पाटील, किशोर माने, विजय माने, रुपाली नलवडे ,आदी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अविनाश गावडे, असिफ मुल्ला, सोनिया लांडगे, दिपाली पाटील, निहाल पठाण,सद्दाम आत्तार यांनी केले. आभार प्रदर्शन राजश्री हरुगडे यांनी केले.