भानामती चे प्रकार म्हणजे जनतेला अंधविश्वासाच्या खाईत लोटण्यासारखे आहे-भरतराज भोसले

बांबवडे :सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुका आहेत. यासाठी या २१ व्या शतकात सुद्धा निवडून येण्यासाठी तंत्र,मंत्र वर विश्वास ठेवत आहेत. सध्या अनेक रस्त्यावर लिंबू मिरच्या आणि टाचण्या सापडू लागल्या असून, निवडणूक काळात याचे प्रस्थ वाढू लागले आहे. सध्याच्या काळात तंत्रावर विश्वास न ठेवता, मंत्रावर लोक विश्वास ठेवू लागले आहेत. यामुळे समाज कोणत्या दिशेकडे निघाला आहे. याची चिंता वाटू लागली आहे, असे मत वारणा रेठरे चे भरतराज भोसले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले कि, सध्या आपण तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणे, हि काळाची गरज आहे. परंतु सध्या लोक भानामती, जादू टोना, तंत्रमंत्र करू लागले आहेत. हि बाब समाजाच्या दृष्टीने घातक आहे.

हि गोष्ट आपल्या शाहुवाडी तालुक्यात प्रखरतेने जाणवू लागली आहे. मोठे मोठे पुढारी सुद्धा भानामती, करणी, यासारख्या गोष्टीवर विश्वास ठेवून रात्री अपरात्री निर्जन ठिकाणी जावून, नैवेद्य लिंबू,टाचण्या यासारखे प्रकार करू लागले आहेत. जे लोकप्रतिनिधी आपली बाजू प्रशासनात जावून मांडणार आहेत. तीच मंडळी अशा समाज विघातक प्रवृत्तींवर विश्वास ठेवत आहेत. आणि असे प्रकार करताना सापडू लागले आहेत. बांबवडे इथंच दोन वेळा हे प्रकार आढळले. एकदा विद्यानंद यादव यांच्या रेणुका मंदिरामागे कोणीतरी उतारा ठेवला होता. दोन दिवसापूर्वी बांबवडे गावाच्या थळपांढर देवी जवळ काहीमंडळी काही करताना सापडली. याचा व्हिडीओ बांबवडे मध्ये व्हायरल झाला आहे.
मूळ गोष्ट अशी कि, आपण सुशिक्षित आहोत. आणि अशा समाज विघातक कृत्यावर विश्वास न ठेवता, आपल्या कष्टावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून कार्यमग्न राहावे. असे आवाहन सुद्धा श्री भरतराज भोसले यांनी केले.
