राजकीयसामाजिक

मतभेदाच्या राजकारणाला तिलांजली देवून विकास करू – आमदार डॉ. कोरे


बांबवडे : ग्रामपंचायत स्तरावरील मतभेदाच्या राजकारणाला तिलांजली देवून विकासाची मुहूर्तमेढ रोवू या. असे मत प्रतिपादन आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकार )यांनी केले.
बांबवडे ता. शाहुवाडी येथील बाबा लाड यांच्या शेड वर ग्रामपंचायत पार्श्वभूमीवर विचार विनिमय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून आमदार डॉ. विनयरावजी कोरे बोलत होते.


कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महादेव श्रीपती पाटील यांनी केले.


यावेळी आमदार डॉ. कोरे पुढे म्हणाले कि, ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान गावागावात संघर्ष निर्माण होतात. असे संघर्ष निर्माण होवू नयेत. ग्रामस्थ आपल्याला विश्वस्त समजून गावाचा कारभार करण्यासाठी आपल्याला निवडून देतात. त्यामुळे गावागावातील इर्षा चे राजकारण न करता, विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देवू या. शाहुवाडी तालुका हा ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारा तालुका असून, गावासाठी नवे उत्पन्न निर्माण कसे होईल, रोजगार निर्मिती कशी होईल, व गाव सामाजिक विकासाच्या मूळ प्रवाहात कसे येईल, यादृष्टीने आपण प्रयत्न करू या. एकमेकांबद्दल द्वेष न बाळगता, बिनविरोध संकल्पना पुढे येत असेल, तर त्याचे स्वागत करण्यास हरकत नाही. असेही आमदार डॉ. कोरे यांनी सांगितले.


यावेळी आमदार डॉ. कोरे यांचा सत्कार आनंदा तोरस्कर यांच्या हस्ते, तर युवा नेते कर्णसिंह गायकवाड यांचा सत्कार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी माजी आरोग्य सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, बाबा लाड आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी सुभाषराव इनामदार, पंडितराव नलवडे, विष्णू पाटील, ज्ञानदेव वरेकर, दादासो पाटील बारगीर, विष्णू यादव, सुभाष पाटील, स्वप्नील घोडे-पाटील, ज्ञानदेव कांबळे, सुरेश नारकर (बापू ), जयवंत पाटील साळशीकर आदी मान्यवरांसहित मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रसंचालन रमेश डोंगरे यांनी केले, तर आभार पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत यांनी मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!