congratulationsसामाजिक

मलकापूर नगरपरिषद म. राज्यात विभागात चौथी व जिल्ह्यात दुसरी

मलकापूर प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देश पातळीवर भरीव कामगिरी करणाऱ्या मलकापूर नगरपरिषदेने राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियान ३.० मध्ये भरीव कामगिरी करत १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करून, राज्यात व पुणे विभागात दुसरा, जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकवला आहे. 


      पर्यावरण रक्षण आणि संवर्धन संदर्भात केलेल्या कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. शहरात स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक इमारतीवर सोलर यंत्रणा, पाण्याचे संवर्धन, पथदिवे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर याबाबत, ऊर्जा बचत,  सार्वजनिक इमारतीचे एनर्जी ऑडिट आणि वॉटर ऑडिट, सायकल ट्रॅक, प्लास्टिक बंदी, १००% कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्यावर प्रक्रिया, विविध जनजागृती चे कार्यक्रम अशी कामे व उपक्रम राबवण्यात आल्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिली.


    आमदर डॉ. विनय कोरे व जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविका, नागरिक, सफाई, आरोग्य, अग्नीशमन कर्मचारी, अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली. या अभियानासाठी नोडल अधिकारी महेश गावखंडकर, विनोद तवर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांच्या मेहनतीचे फळ मिळाले असून, हा शहराचा सन्मान असल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विद्या कदम यांनी माहिती देताना सांगितले.


या अंतर्गत एक कोटी चे बक्षीस प्राप्त झाले असून, या बक्षीसाचा वापर पर्यावरण व संवर्धनासाठी केला जाईल.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!