महाराजस्व अभियान नागरिकांना चालना देणारे- सौ राजकुंवर गायकवाड जि.प.सदस्या
बांबवडे : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान, हे सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या उन्नतीला चालना देणारे ठरणार आहे. असे मत प्रतिपादन जि.प. सदस्या राजकुंवर रणवीरसिंग गायकवाड यांनी केले. त्या बांबवडे ता. शाहुवाडी येथील समर्थ कृपा हॉल मध्ये सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान प्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रशासकीय विभागाने हॉल च्या दुतर्फा स्टॉल लावले होते. याठिकाणी नागरिकांनी येवून आपल्या अडचणी सांगायच्या होत्या. त्यावर त्या खात्यातील अधिकारी वर्ग नागरिकांना मार्गदर्शन करीत होते.
यावेळी सौ गायकवाड पुढे म्हणाल्या कि, महसूल विभागांतर्गत सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या प्रश्नांचे जागेवरच निराकरण करण्यात येत होते. त्यामुळे हे अभियान जनतेसाठी उपयुक्त असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील सौ. गायकवाड यांनी केले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तहसीलदार सीमा सोनावणे यांनी या अभियानाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच या अभियानात अनेकांचे प्रलंबित दाखले सुद्धा देण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य श्री अभयसिंह चौगुले आपल्या मनोगतात म्हणले कि, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम शेतकऱ्यांना बळ देणारा ठरणार आहे. कारण सर्वसामान्य लोकांना किरकोळ कामांसाठी प्रशासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांचे ते हाल थांबताना दिसतील.
यावेळी जिल्हामुद्रंक अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच बांबवडे येथील ग्राम महसूल अधिकारी श्री गगन देशमुख यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल तसेच नियोजनाबद्दल बांबवडे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच भगतसिंग चौगुले, पंचायत समिती सदस्य अभयसिंह चौगुले, सुरेश नारकर, मुकुंद पवार आदी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्या सौ लक्ष्मी पाटील, बांबवडे गावच्या उपसरपंच सौ. मनीषा पाटील, मंडल अधिकारी शिवाजी पन्हाळे, डॉ.एच.आर. निरंकारी, तालुका मुद्रांक अधिकारी सुनील इंगवले, नायब तहसीलदार प्रदीप जाधव, नरेंद्र गायकवाड, पशु सहायक आयुक्त डॉ. श्याम कोळेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील, पुरवठा अधिकारी भारती भोसले, पर्यवेक्षिका राणी पाटील, अश्विनी पाटील, ग्राम महसूल अधिकारी थेरगाव चैताली पुजारी, पल्लवी पाटील शित्तूर तर्फ मलकापूर, श्रीधर पाटील साळशी, अभिजित साळवी चरण, आदि अधिकारी वृंद यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
