मानवतेचा त्रिवेणी संगम म्हणजे विष्णू पाटील -आमदार डॉ. विनय कोरे
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील सोनवडे पंचक्रोशी तील सहकार, राजकारण आणि समाजकारण क्षेत्रातील मानवतेचा त्रिवेणी संगम म्हणजे विष्णू जोती पाटील हे होय. असे मत आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केले.
ठमकेवाडी येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात श्री विष्णू पाटील यांची पंच्याहत्तरी नुकतीच संपन्न झाली. यावेळी कार्याक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. विनय कोरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नवनाथ आदमापुरे यांनी केले.


यावेळी डॉ. विनय कोरे पुढे म्हणाले कि, आपल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विष्णू पाटील यांनी शिपाई पदापासून बँकेच्या शाखाधिकारी पदापर्यंत पोहचले होते. त्यांचा सहकारातील प्रवास अतिशय संघर्षमय आणि आदर्शवत होता. त्यांनी आपल्या वडिलांकडून सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासला आहे. श्री विष्णू पाटील यांनी आयुष्यात तत्वनिष्ठ राजकारण आणि जोपासलेले समाजकारण यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असेही आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सत्कारमूर्ती विष्णू पाटील म्हणाले कि, आमची जडण घडण दिवंगत नेते गोविंदराव पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यामुळे मी माझ्या जीवनात यशस्वी झालो. स्व. माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड व दिवंगत आमदार संजयसिंह गायकवाड यांच्यामुळे राजकारणात आलो. परंतु शेवटपर्यंत मी एकनिष्ठ राहिलो आहे. सहकारातील नोकरीमध्ये अनंत अडचणी आल्या, तरी मी ठाम राहिलो. संजयदादा यांच्यामुळे शाहुवाडी पंचायत समिती चा उपसभापती होण्याचे भाग्य लाभले. कामगार संचालक उदयगिरी संचालक, संस्थापक चेअरमन संजयसिंह गायकवाड कामगारांची सह. पतसंस्था अशा संस्थांवर पदे उपभोगली आहेत. पण तत्वावर आणि विचारावर ठाम राहिलो, म्हणूनच सर्वसामान्य जनतेची कामे करू शकलो.
यापुढेही असेच काम करीत राहणार आहे. आपण आजवर केलेले प्रेम आणि आपुलकी अशीच निरंतर राहू द्या, असे भावनिक उद्गार श्री विष्णू पाटील यांनी यावेळी काढले.
यावेळी कर्णसिंह गायकवाड, जि.प. सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर, बाळासाहेब गद्रे, सुभाषराव इनामदार, पंडितराव नलवडे, आर. डी. पाटील, माजी सभापती महादेवराव पाटील, बाबा लाड आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी सौ. आनंदी पाटील, माजी सभापती सौ. भाग्याश्रीदेवी गायकवाड, माजी जि.प. सदस्य विजयराव बोरगे, विक्रमसिंह पाटील, पैलवान वसंत पाटील, सरपंच प्रकाश पाटील, शंकर बारगीर, विष्णू यादव, विद्यमान उपसभापती अमरसिंह खोत, दमयंती आदमापुरे, सौ. शीतल अतिग्रे, सुभाष पाटील, मारुती चव्हाण, स्वप्नील घोडे-पाटील, माजी उपसरपंच सुरेश नारकर, सुहास कोल्हापुरे, स्वप्नील लाड, विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश डोंगरे आणि धोंडीराम खुटाळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विक्रमसिंह पाटील यांनी मानले.
