सामाजिक

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन


बांबवडे : आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीवर्षा निमित्त अवघा महाराष्ट्र १०० सेकंदासाठी स्तब्ध झाला. निदान शाहू महाराजांच्या नावाने लोकप्रिय असलेला शाहुवाडी तालुका निश्चितच कृतज्ञतापुर्वक १०० सेकंद स्तब्ध होता.


ग्रामपंचायत बांबवडे , बांबवडे पोलीस चौकी आणि बांबवडे पंचक्रोशीतील तमाम नागरिक यावेळी स्तब्ध झाले होते. प्रत्येकाचे हृदय अभिमानाने भरून आले होते. कारण याच छत्रपतींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी रत्ने उदयास आली,, आणि संविधानाचा जन्म झाला. अशा थोर राजांसाठी मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ कोल्हापूर नगरीत उपस्थिती दर्शवतील अशी अपेक्षा होती, पण नाही. असो. नेहमीच कोल्हापूर ला अडचणींच्या वेळी याद करणारे आमचे शिवसेनेचे मुखमंत्री आमच्या राजांच्या या अमुल्य वेळी अखेर विसरलेच. काय करणार शेवटी राजकारणीच. असो. एका आज्जींच्या ‘ झुकेंगा नही ‘ या डायलॉग वर मुख्यमंत्री खुश झाले, आणि त्यांच्या घरी पोहचले. पण या आमच्या राजाने अवघ्या इंग्रज शासनाला सुद्धा झुकेंगा नही ,हे ठणकावून सांगितले होते. असो.


कोल्हापूर च्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुन्हा एकदा कृतज्ञतापुर्वक विनम्र अभिवादन.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!