सामाजिक

रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय व जैविक खते वापरा – सौ पुरेकर

मलकापूर प्रतिनिधी : स्वयंसिद्धा आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने वारूळ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी भात बीज प्रक्रिया, हुमणी किडा नियंत्रण व जैविक खताचा वापर याच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले.


शिबिराच्या अध्यक्षस्थानी बापू बोटांगळे होते.
गावाच्या अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर स्वीकारावा,असे आवाहन स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा सौ. पुरेकर यांनी केले.


कृषी सहाय्यक वळवी यांनी भात बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक सादर करून, हुमणी कीड नियंत्रण उपाययोजना स्पष्ट केल्या. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय व जैविक खतांचा वापर मानवाप्रमाणे मातीच्या आरोग्याच्या दृष्टीने मोलाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी कृषी पर्यवेक्षक, उपसरपंच गोविंद सुतार, मारुती बोटांगळे, माधवी हांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी प्रास्ताविक राजेंद्र लाड यांनी केले,तर आभार भगवान पाटील यांनी मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!