विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मनसे चे बाळा नांदगावकर लक्ष घालणार – युवराज काटकर
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू असलेला किल्ले विशाळगड, अतिक्रमण मुक्त करण्यासंदर्भात मनसेचे वरिष्ठ नेते श्री बाळा नांदगावकर लक्ष घालणार असल्याचे, मत मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

युवराज काटकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दाखल झाल्यापासून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालुक्यातील पाऊल खुणा जपण्यासंदर्भात सतत प्रयत्न केले आहेत. तालुक्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळ असलेले किल्ले विशाळगड, हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. तसेच इथं घाणीचे साम्राज्य आहे. या संदर्भात आम्ही सतत प्रयत्नशील असतो.


यासाठी जनजागृती करीत आहोत. तसेच पुरातत्व विभागाने या किल्ल्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. किल्ल्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी शासनदरबारी सतत प्रयत्न सुरु आहेत. तसेच हा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. असेही श्री युवराज काटकर यांनी सांगितले.

या अनुषंगाने मनसे चे वरिष्ठ नेते श्री बाळा नांदगावकर यांच्याशी भेट घेवून चर्चा केली. यासंदर्भाने त्यांनी विशेष लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून, किल्ले विशाळगड लवकरच एक उत्कृष्ठ पर्यटन स्थळ म्हणून तालुक्यातून राज्याच्या नकाशावर नावारूपाला येईल, असेही श्री युवराज काटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.