सामाजिक

शरीर शुद्धीकरण करा, आणि व्याधीमुक्त व्हा- डॉ. दिलखुष तांबोळी

बांबवडे : आपल्या शरीरात होणाऱ्या बदलामुळे भविष्यात अनेक व्याधी शरीरात निर्माण होतात. हे आजार होवू नयेत, म्हणून करावयाचे जे उपाय आहेत, त्यासाठी आयुर्वेदिक शिबीर कांकायन आयुर्वेदिक हॉस्पिटल च्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.

याचा फायदा घेवून, आपल्या शरीराची शुद्धी करून, व्याधीमुक्त व्हावे, असे आवाहन गोल्ड मेडलीस्ट कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल चे डॉ. दिलखुष तांबोळी यांनी केले आहे.

कांकायन हॉस्पिटल च्या वतीने वासंतिक वमन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात आपली नावे नोंदणी करावी. यामुळे शरीराचे आरोग्य पुन्हा Reset  करण्यात येईल, आणि शुद्धीकरण करण्यात येईल. चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे वात, पित्त, कफ हे दोष शरीरात वाढत जातात, आणि एकेदिवशी मोठा आजार निर्माण करतात. अशा दोषांची वाढच होवू नये, त्या निरोगी व्यक्तींनी आणि ज्यांना आजार आहेत, अशा व्यक्तींनी वसंत ऋतूमध्ये वमन करून घ्यावे.

शरीरात नेहमी आळस असणे, घश्यात कफ येणे, वारंवार पित्ताचा त्रास होणे, पोटात गॅसेस तयार होणे, अशा तक्रारी असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने शरीरशुद्धी करून घ्यावी.

वसंत ऋतूमध्ये शरीरातील कफदोष नैसर्गिकरीत्त्या वाढतो. यामुळे दमा, कफ, सर्दी, स्थूलता, त्वचारोग, प्रमेह, थकवा, आळस यासारख्या तक्रारी वाढतात. यावर आयुर्वेदातील सर्वोत्कृष्ट पंचकर्म यामधील वमन कर्म हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे.

वमन कर्माचे अनेक फायदे आहेत. शरीरातील वाढलेला कफ पूर्णपणे बाहेर काढतो. श्वसन विकारांमध्ये लक्षणीय आराम मिळतो. पचनशक्ती व प्रतिकारशक्ती वाढते. वजन नियंत्रणात मदत करते. शरीर व मन दोन्ही हलके व ताजेतवाने होतात. शरीरातील आळस पूर्णपणे निघून जातो. शरीरात नको असलेले पित्त यात बाहेर पडून जाते.

PCOD / PCOS, वंध्यत्व, पाळीच्या तक्रारी मध्ये उपयुक्त ठरते. थायरॉईड चा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातात. पूर्वकर्म, मुख्यकर्म, व पश्चात कर्म यांचे शास्त्रशुद्ध नियोजन  केले जाते. योग्य आहार व जीवनशैली मार्गदर्शन केले जाते.

यासाठी आजच नाव नोंदणी करा, व आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करा, असे आवाहन देखील डॉ.दिलखुष  एम. तांबोळी यांनी केले आहे. वमन करण्याचा कालावधी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आणि मे या महिन्यांमधील पहिले पंधरा दिवस वमन साठी उपयुक्त असतात.              ( वातावरणातील बदलांचा अभ्यास करून काही निर्णय घेतले जातात )

अधिक माहितीसाठी ८४८५००९०५१, ०२३१- २९९१०७२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कांकायन च्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ. दिलखुष एम. तांबोळी एम.डी. आयुर्वेद गोल्ड मेडलिस्ट, डॉ. सौ. वहिदा तांबोळी एम.डी. आयुर्वेद कांकायन  आयुर्वेद हॉस्पिटल, पेंढारकर कॉम्प्लेक्स, व्हीनस कॉर्नर, कोल्हापूर. मुंबई येथे व्हिजीट दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी फिनिक्स हॉस्पिटल, चिकूवाडी बोरीवली वेस्ट मुंबई.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!