शासनाची तत्काळ मदत लोकांना सुपूर्द – तहसीलदार गुरु बिराजदार
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यात पुरामुळे नुकसान झालेल्या येळाणे येथील पूरग्रस्त नागरिकांना शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या मोफत रेशन धान्य वाटपाचा शुभारंभ शाहुवाडी चे तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रशासनाच्या माध्यमातून पूर स्थितीचे पंचनामे करण्याबरोबरच सर्व बाबींची दखल घेतली जात आहे. ,नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे, व सतर्कता बाळगावी, असे आवाहनही यावेळी तहसीलदार गुरु बिराजदार यांनी केले आहे.
शाहुवाडी तालुक्यात आलेल्या महापुराने शेतीसह घरातील साहित्य यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे अन्नधान्य हि पुरामध्ये वाहून गेले आहे. पूरग्रस्त नागरिकांना शासनाच्या वतीने तत्काळ मदत म्हणून धान्य वाटप केले जात आहे, तर अन्य नुकसानग्रस्त भागाचे हि पंचनामे करून, त्याचा पूर्ण अहवाल शासनाकडे सादर करण्याचीहि, प्रक्रिया सुरु असल्याचेही यावेळी तहसीलदार गुरु बिराजदार यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच मधुकर पाटील, मंडल अधिकारी विश्वास डोंगरे, पोलीस पाटील ज्ञानदेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोहित जांभळे,आदी मान्यवर उपस्थित होते.