सामाजिक

शाहुवाडी आपत्ती व्यवस्थापन मान्सून साठी सज्ज – तहसीलदार श्री बिराजदार


बांबवडे प्रतिनिधी : मान्सून राज्याच्या सीमेपर्यंत पोहचला आहे. येणाऱ्या मान्सून चं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शाहुवाडी तालुक्यातील प्रशासनाने देखील दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका सुद्धा होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अतिवृष्टी झाल्यास, त्याला तोंड देण्यासाठी बोटी सुद्धा सज्ज करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष तहसीलदार गुरु बिराजदार ,तसेच गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.


या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन समिती ची प्रात्याक्षिके सुद्धा करण्यात आली आहेत.


याबाबत पावसाळ्यात कोणतेही जीवित अथवा वित्तहानी होवू नये, यासाठी प्रशासकीय स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका झाल्या आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी अनिल वाघमारे साहेब यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.


गेल्या वर्षी शाहुवाडी तालुक्यात पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळे भूस्खलन, त्याचबरोबर पूर आल्याने नागरिकांची त्रेधा तीरपिट उडाली होती. अनेक घरात पावसाचे पाणी घुसल्याने लोकांना घरातून बाहेर निघणे मुश्कील झाले होते. त्यावेळी वाड्या वस्तीवर अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, तहसीलदार गुरु बिराजदार साहेब, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे साहेब यांनी आपली कार्यतत्परता त्यावेळी दर्शवली. त्यामुळे नागरिकांची बऱ्याच अंशी सुविधा झाली. जीवितहानी, तसेच वित्तहानी टळली. यामुळे शित्तूर वारुण येथील भूस्खलन वगळता, इतर कोणताही मोठा अनर्थ घडला नाही.


यावर्षी सुद्धा अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नागरिकांच्या असुविधा टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी झाली आहे, असेही तहसीलदार गुरु बिराजदार यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!