educationalसामाजिक

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधावी – श्रीमती सरोज पाटील (माई )

बांबवडे : शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता शोधावी. प्रत्येक मुलात काही न काही गुणवत्ता असतेच. फक्त शिक्षकांनी ती शोधणे, गरजेची असते. तेंव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या सर्वेसर्वा श्रीमती सरोज पाटील उर्फ माई यांनी शिक्षकांना केले आहे.
रयत शिक्षण संस्थेचे सरूड तालुका शाहुवाडी येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा माईंच्या हस्ते संपन्न झाला. कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर होते.यावेळी माई बोलत होत्या,
त्या पुढे म्हणाल्या कि, मला लढायला आवडते, रडायला नाही. दरम्यान येथील इमारत ज्या ठिकाणी उभी रहात आहे. त्याठिकाणी क्रीडांगण आहे. संस्थेकडे इमारत बांधण्यासाठी इतर जागा आहे. त्याठिकाणी इमारत उभी करावी. क्रीडांगण युवकांना खेळण्यासाठी शिल्लक रहावे, अशा आशयाचे निवेदन येथील युवकांनी माईंना दिले. त्यावेळी सर्वांना विश्वासात घेवून कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधितांना केल्या.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर म्हणाले कि, चांगल्या कार्यात कुणीही खोडा घालू नये. असे आवाहन केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!