शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावी- श्री अमरसिंह पाटील
बांबवडे : शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याच्या शेताच्या बांधापर्यंत कृषीविषयी मार्गदर्शन पोहचले पाहिजे. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा हा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वच योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे, हि काळाची गरज आहे. असे मत प्रतिपादन नूतन जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांनी केले आहे.
शाहुवाडी पंचायत समिती मध्ये पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती च्या नूतन सभापती प्रियांका भोसले उपस्थित होत्या.
यावेळी श्री अमरसिंह पाटील पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वच योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणे, हि काळाची गरज आहे. कृषी क्षेत्रात रोज नवनवीन अमुलाग्र बदल होत आहेत. यासाठीच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्यांना मार्गदर्शन गरजेचे आहे.असेहि,श्री अमरसिंह पाटील म्हणाले.
यावेळी जनसुराज्य पक्षाचे जि.प. चे गट नेते सर्जेराव पाटील पेरीडकर म्हणाले कि, शाहुवाडी तालुका हा ग्रामीण डोंगर वाड्या वस्तीत विखुरलेला तालुका आहे. शेती हे मुख्य आर्थिक स्त्रोत येथील शेतकऱ्यांचे आहे. शासन स्तरावर अशा योजनांमुळे शेतकऱ्यांना बळकटी मिळेल. सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करू या. बांबू लागवड आणि प्रगत शेतकरी हि संकल्पना आमदार डॉ. विनय कोरे यांची असून, आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सार्वजनिक विकासासाठी सर्व काही प्रयत्न केले जातील.

यावेळी उपसभापती अमरसिंह खोत, गटविकास अधिकारी मंगेश कुन्चेवार यांनी मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी बांबू रिसर्च फौंडेशन चे पाटलोबा पाटील यांनी बांबू लागवडीविषयी मार्गदर्शन केले. निवृत्त पशुधन विकास अधिकारी श्रीकृष्ण भट यांनी आधुनिक कुक्कुटपालन विषयी विस्तृतपणे माहिती दिली. यावेळी गुणीजनांचा प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी नूतन जि.प.सदस्य स्नेहल वेल्हाळ,पंचायत समिती सदस्य अभयसिंह चौगुले, डॉ. धनश्री जाधव, लक्ष्मी पाटील, माधुरी पाटील, सुरेश पवार, तालुका कृषी अधिकारी नीलम चाकणे, कृषी अधिकारी अंकुश गोरे, शिवाजी काशीद, पर्यवेक्षक संदीप शेळके, विस्तार अधिकारी बाजीराव गायकवाड, अंकुश शेलार, यांच्यसह शेतकरी व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
