राजकीयसामाजिक

“ शेती वाचवा, शेतकरी वाचवा परिषद ”ला उपस्थित राहा- भाई भारत पाटील

बांबवडे :  शासनाला माणसापेक्षा जनावरांच्या जीवाची अधिक काळजी आहे. कारण जंगली जनावरे शेतकऱ्यांच्या शेतीची नासधूस करतात, त्याचबरोबर शेतकऱ्यावर हल्ले करतात. त्यामुळे शेतकरी जखमी होतात, प्रसंगी शेतकऱ्याला जीव गमवावा लागतो. असे जरी होत असले तरी शेतकऱ्याच्या जीवाची किंमत शासनाला नाही. असे शासनाचे धोरणआहे, ज्यामुळे शेतकऱ्याचे मरण होत आहे. यासाठीच “ शेती वाचवा, शेतकरी वाचवा परिषद ” श्रमिक शेतकरी संघटना , महाराष्ट्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष यांच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवणे, हि काळाची गरज आहे. त्यासाठी दि.१२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता “ शेती वाचवा, शेतकरी वाचवा परिषद ” शेतकरी परिषद बोलाविण्यात आली आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेकाप चे भाई भरत पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषद मध्ये दिली.

यावेळी भाई भारत पाटील म्हणाले कि, प्रशासन हे केवळ भांडवलदार आणि दलालांची बाजू घेत आहेत. त्यांना गरजेची असलेली भूमिका बजावत आहेत. रत्नागिरी – नागपूर हायवे साठी शेतकरी जनतेकडून जमीन घेतली. त्यामुळे शेतकरी भूमिहीन होत आहे. त्याचपद्धतीने शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत आहे. यातूनही शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण करण्याच्या प्रयत्नात आहे. जो मार्ग शेतकरी जनतेला नको आहे. तरीसुद्धा तो मार्ग बनविण्याच्या प्रयत्नात प्रशासन आहे. वनविभाग शेतकऱ्याला सहकार्य करीत नाही. जंगली प्राण्यांचे व्यवस्थापन करणे, हि वनविभागाची जबाबदारी आहे. असे असतानाही जंगली जनावरे शेतकऱ्याच्या शेतात घुसून पिकांची नासधूस करीत आहेत. प्रसंगी शेतकऱ्याला जखमी करीत आहेत, किंबहुना त्यांना जीवे देखील मारले जात आहे. असे असताना वन विभाग फक्त प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मग शेतकऱ्याला कोण वाचवणार? असे अनेक प्रश्न आहेत. यासाठी आपण सर्व एकत्र येवून सरकारला जाब विचारला पाहिजे. यासाठी १२ एप्रिल च्या शेतकरी परिषदेला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाई भारत पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून  केले आहे. १२ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या शेतकरी परिषदेला शेतकरी नेते खासदार राजाराम सिंग, स्वाभिमानी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत.

या पत्रकार परिषदेला कॉम्रेड अतुल दिघे, राजाराम मगदूम, शामराव पाटील, सुरेश म्हाऊटकर, भैय्या थोरात, तुकाराम तळप, मनीष तडवळेकर, शामराव मिस्त्री, सदाशिव खोपडे, संतोष पाटील, नामदेव थोरात, शिवाजी शेळके, अशोक नायकवडी  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!