सामाजिक

समाजाला आभाळमाया फौंडेशन सारख्या संस्थांची गरज- जिल्हाधिकारी अमोल येडगे

बांबवडे : समाजाला सामाजिक संस्थांची गरज असून, अशा संस्थांनी समजासाठी वृक्षारोपण यासह अनेक सामाजिक उपक्रम हाती घेणे ,काळाची गरज आहे. यासाठी आभाळमाया सारख्या संस्था समाजात क्रियाशील होणे, हि काळाची गरज आहे. असे मत जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी व्यक्त केले.
आभाळमाया फौंडेशन या संस्थेचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्यासह खासदार धैर्यशील माने, चेतन नरके, माजी आमदार सत्यजीत पाटील ,प्रवीण छाबडा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले कि, शाहुवाडी तालुका निसर्गाने संपन्न आहे. अशा तालुक्यात सामाजिक संस्था गरजेच्या आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चौगुले यांनी केले. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केलीत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!