” हर घर तिरंगा ” कॉंग्रेस शाहुवाडी च्यावतीने तिरंगा पदयात्रा संपन्न
बांबवडे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनजागृती साठी शाहुवाडी तालुका कॉंग्रेस च्यावतीने खुटाळवाडी ते बांबवडे ” तिरंगा ” पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेच्या अध्यक्षस्थानी गोकुळ चे संचालक श्री कर्णसिंह गायकवाड हे उपस्थित होते.

यावेळी भारतमाता की जय, जय जवान, जय किसान, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी अनेक मान्यवर व ग्रामस्थ या पदयात्रेत सामील झाले होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण जनतेला व्हावी. या लढ्याची ” जाण ” नव्या पिढीला व्हावी, या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ” हर घर तिरंगा ” या उपक्रमाची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.


दरम्यान यावेळी बाळासाहेब गद्रे, पंडितराव नलवडे, महादेवराव पाटील, विष्णू पाटील, अमरसिंह खोत, भरतराज भोसले, धनराज लाड, सयाजी निकम, आनंदा तोरस्कर, सुनील पाटील, दशरथ खुटाळे, आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.