७१ वर्षाचं एक चिरतरुण नेतृत्व : श्री जयवंतराव काटकर साहेब
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील एक चिरतरुण नेतृत्व आज ७१ वर्षांचं झालं. एकेकाळी एक कणखर व्यक्तिमत्व म्हणून, त्यांच्याकडे पाहिलं जायचं. एक दिलदार मित्र आणि चौफेर फटकेबाजी, बिनधास्त पणे करणारे एक अष्टपैलू खेळाडू, म्हणून त्यांचा नावलौकिक असायचा, आणि आजही आहे. वाघ कितीही वर्षांचा असला, तरी तो वाघच असतो. असं हे व्यक्तिमत्व नेहमीच शाहुवाडी तालुक्याला भावलं. अशा या व्यक्तिमत्वाचे नाव आहे. श्री. जयवंतराव काटकर. त्यांचा आज ७१ वा वाढदिवस. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने या दिलखुलास नेतृत्वाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

काटकर साहेब एकेकाळचे स्व.आमदार संजयदादांचे विश्वासू कार्यकर्ते होते. तो काळ म्हणजे अगदी तडकाफडकी चा काळ होता. साहेबांचे वक्तृत्व म्हणजे एकेकाळची धडाडणारी तोफ होती. यांच्या आवाजावर टाळ्या पडल्याशिवाय रहात नसायच्या. संजयदादांचे जे चार मजबूत खांब होते, त्यांच्यापैकी काटकर साहेब एक म्हणायचे. त्यावेळचा प्रचार आणि रात्रीचा दिवस करणारे कार्यकर्ते म्हणजे काटकर साहेब, रामभाऊ लांबोरे, नामदेवराव खोत. बाळासाहेब गद्रे, असे अनेक कार्यकर्ते संजयदादांच्या विश्वासातले असायचे.

त्यानंतर वैचारिक मतभेद झाल्यामुळे साहेब शिवसेनेत गेले. तिथे सुद्धा एका वाघाची भेट दुसऱ्या वाघाबरोबर झाली. ते म्हणजे स्व.बाळासाहेब ठाकरे. तिथेसुद्धा साहेबांनी आपले सर्वस्व पणाला लावून काम केले. परंतु तिथेसुद्धा काही चीज झाले नाही. त्यामुळे हा ” वाघ ” एकाकी पडला. असो. सध्या राजसाहेब आहेत. बघू या ते काय करतात. पण माणूस म्हणून काटकर साहेब एक ” राजा माणूस “. या व्यक्तिमत्वाकडे दानत आहे, सर्व सामान्यांना सोबत नेण्याची. आज त्यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते किमान दहा ते बारा वर्षांपासून सोबत असतील. आज त्यांचे चिरंजीव युवराज काटकर .ते हि वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहेत. पण डरकाळी वाघाची असावी, अशी सर्व सामान्यांची अपेक्षा आहे.

पुनश्च, एका दमदार व्यक्तिमत्वाचे औक्षण व्हावे. श्री जयवंतराव काटकर साहेब शतायू व्हावेत. आणि हे चिरतरुण नेतृत्व केवळ जिल्ह्याला नव्हे ,अवघ्या महाराष्ट्राला पाहायला मिळावे . हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.