!! जय श्री राम !!
\बांबवडे : अयोध्येत आज प्रभू श्री राम यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना, समस्त भारत वर्षाला आनंद होत आहे. प्रभू श्री राम हे प्रत्येक हिंदू आणि देव मानणाऱ्यांच्या हृदयात विराजमान आहेत. ह्या मंदिराच्या उभारणी नंतर मात्र खऱ्या अर्थाने ते समोर आले आहेत.
प्रभू श्री राम यांचा हा सोहळा पाहण्याकरिता अनेक राज्यातून निमंत्रित आले आहेत. परंतु सर्व सामान्य मात्र हा सोहळा ” याची देही , याची डोळा ” पाहू शकत नाहीत. याचे कारण मात्र समजू शकले नाही. निवडक मंडळींना निमंत्रण म्हणजे भारतातील सर्व सामान्य जनतेला फसवले असे होत नाही का ? अशी भावना काही लोकांच्यातून व्यक्त केली जात आहे. याचे कारण सुरक्षा असू शकते. परंतु ज्यावेळी कारसेवकांनी पुढे होवून ह्या मंदिराच्या उभारणीसाठी आपले जीवन समर्पित केले . त्याला अर्थच नाही का ? असो.
अशा मंगल प्रसंगी राजकारण होवू नये, हीच अपेक्षा
जय श्रीराम !!!