सामाजिक

प्लास्टीकचा वापर टाळणे गरजेचे – स्वच्छता दूत रूपेश वारंगे

मलकापूर प्रतिनिधी :
पर्यावरणाच्या रक्षणाबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने ही प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टीकचा वापर टाळणे गरजेचे असल्याचे, प्रतिपादन मलकापूर नगरपरिषदेचे स्वच्छता दूत रूपेश वारंगे यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण कार्यक्रम अंतर्गत आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले .
मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी अॅलीस पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष अमोल केसरकर , उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून ‘ स्वच्छ सर्व्हेक्षण मलकापूर ‘ ही मोहीम गतीमान केली आहे. त्या अनुषंगाने प्लास्टीक मुक्तीसाठी जनजागरण मोहीमेतर्गंत रूपेश वारंगे बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, दिवसेन् दिवस पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर ही होत आहे. आपण प्रत्येकाने एक जबाबदार नागरीक या नात्यान प्लास्टीक मुक्तीसाठी आपल्यापासून सुरवात करण गरजेच आहे. सुका आणि ओला कचरा वेगळा करून स्वच्छतेचा मलमुत्रं जपण आवश्यक आहे .
आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण प्लास्टीकला पर्याय असणाऱ्या कापडी ,कागदी पिशवीचा वापर केला पाहीजे. मलकापूर नगर परिषदेच्या शहरकोऑर्डीनेटर मेगा स्वामी यांनी ही कागदी पिशवी बनवण्याच्या प्रक्षिणाच्या माध्यमातून माहीती दिली असल्याचं ही या वेळी त्यांनी नमूद केल .
या जन जागृती मोहीमे प्रसंगी मलकापूर नगरपरिषदेचे कर्मचारी, शहरातील नागरीक उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!