ऊसाला ३४०० /-रु.दर मिळावा-खासदार राजू शेट्टी
जयसिंगपूर : यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्याच्या ऊसाला ३,४००/-रु. प्रती टन दर द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. आज जयसिंगपूर तालुका हातकणंगले इथ स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १६ वी ऊस परिषद संपन्न झाली.
प्रती वर्षी या ऊस परिषदेनंतर शेतकऱ्यांच्या ऊसाला दर मिळण्याच्या घटना सुरु होतात,आणि तडजोडी नंतर एक अंतिम दर ठरविला जातो. या अगोदर स्वाभिमानी चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यांवर शेतकऱ्यांनी फुलांची बरसात केली.