राजकीय

शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोहचवण्यासाठी शिवार संवाद- आमदार शिवाजीराव नाईक

शिराळा : शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी समजावून घेवून, शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी शिवार संवाद अभियान सुरु करण्यात आल्याची माहिती, आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिली.
अंत्री खुर्द ,अंत्री बुद्रुक, वाकुर्डे खुर्द, वाकुर्डे बुद्रुक या गावात आयोजित शिवार संवाद सभेत ते बोलत होते.
शासनाने शेतकऱ्यांना रोख आर्थिक मदत यासोबत पिक विमा , शेततळे, अत्याधुनिक कृषी अवजारे, बी-बियाणे, कीटकनाशके , रासायनिक व सेंद्रिय खते, माती परीक्षण, शेतकरी आरोग्य विमा, गोपीनाथ मुंढे अपघाती विमा, गट शेती, गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार, यांची माहिती आमदार नाईक यांनी शेतकऱ्यांना दिली. याप्रसंगी औत हाकून शेतकऱ्यांसोबत पिठलं भाकरी सुद्धा खाल्ली.
यावेळी बाळकू पाटील, आनंदराव पाटील, उत्तम पाटील, सुखदेव पाटील, प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील, रणजीत कांबळे, संभाजी पाटील, संदीप केसरकर, मंगलनाथ पाटील, मारुती पाटील, उत्तम पाटील, सर्जेराव जाधव, श्रीरंग जाधव उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!