मराठा मोर्चाला पाठींबा देण्यासाठी बहिरेवाडीचा तरुण सायकल वरून मुंबईला रवाना
कोडोली प्रतिनिधी-:
मराठा समाजाला आरक्षण मिळाळे पाहिजे, या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने गेली काही दिवस विविध स्वरूपाची आंदोलन केली जात आहेत. .येत्या ९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या वतीने मुंबई मध्ये महामोर्चा आयोजित केले आहे. या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी बहिरेवाडी ता.पन्हाळा येथील संपत दगडू खाके हा तरुण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून, बहिरेवाडी ते मुंबई हा प्रवास सायकल वरून पूर्ण करणार आहे. आज त्यांनी गावातून मुबई कडे प्रस्थान केले, ते ९ ऑगस्ट रोजी मुंबई मध्ये पोहचणार आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून समाजाच्या वतीने गेली काही दिवस आंदोलन केली जात आहेत. येत्या 9 ऑगस्ट ला मुंबई मध्ये समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावचे तरुण संपत खाके हे सायकल वरून प्रवास करून मुंबईला निघाले आहेत.आज सकाळी १० वाजता ग्रामदैवत भैरोबा ला वंदन करून, त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. राज्य शासनाला जाग आणण्यासाठी हा प्रवास सायकल वरून करत असल्याचे, श्री खाके यांनी सांगितले.
यापूर्वी त्यांनी शेतकरी कर्जमाफी साठी देखील बहिरेवाडी ते मुंबई असा प्रवास केला होता. तसेच जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत पायात पादत्राणे घालणार नाही. असा पण देखील त्यांनी केला आहे. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रकाश सुतार, रणजित मिस्त्री, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. साधारण पणे ४०० किलोमीटर लांबीचा प्रवास ते सायकल वरून पार करणार आहेत. आणि राज्यशासनाला मराठा आरक्षणबदल जागे करण्याचा प्रयत्न करणार आहेत.