खुटाळवाडी ते बांबवडे शाहुवाडी तालुका कॉंग्रेस ची आझादी गौरव यात्रा संपन्न
बांबवडे : ११ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजनेच्या दरम्यान खुटाळवाडी ते बांबवडे अशी आझादी गौरव यात्रा शाहुवाडी तालुका कॉंग्रेस च्या वतीने संपन्न झाली. यावेळी या तिरंगा पदयात्रेचे नेतृत्व गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी केले.

कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याचे कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सूचनेनुसार या आझादी गौरव यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी घर घर तिरंगा पोहचवण्याचे आवाहन कर्णसिंह गायकवाड यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नव्य पीढीला स्वातंत्र्यसंग्रामाची आठवण व्हावी, ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले, त्यांची जाणीव सगळ्यांना व्हावी ,या अनुषंगाने या तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी भारतमाता कि जय, जय जवान जय किसान, अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी या पदयात्रेचे नेतृत्व करताना, सांगितले कि,या देशाचा हा ७५ वा स्वातंत्र्यदिन संपन्न होत आहे. परंतु यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून ,या स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली, आणि आपल्या प्राणांचे बलिदान केले. म्हणून आज हे स्वातंत्र्य आपण अनुभवत आहोत. अशा स्वातंत्र्य सैनिकांची आठवण तमाम नागरिकांना व्हावी, या अनुषंगाने या आझादी गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तेंव्हा हा तिरंगा ध्वज घराघरात पोहचला पाहिजे, तसेच त्याचे भान देखील ठेवले पाहिजे, असे आवाहन श्री कर्णसिंह गायकवाड यांनी केले.

यावेळी तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सुभाषराव इनामदार, महादेव पाटील, बाळासाहेब गद्रे, विष्णू पाटील, अमरसिंह खोत, भरतराज भोसले, पंडितराव नलवडे, बाळासाहेब गद्रे , सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रभाकर कांबळे, महिला कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सौ वैशाली सुभाषराव बोरगे, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष धनराज लाड, अनुसूचित जाती सेल चे तालुका अध्यक्ष शामराव कांबळे, संभाजीराव मोहिते, खुटाळवाडी सरपंच विलास खुटाळे, दशरथ खुटाळे व कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.