गुणवत्ता तपासणी प्रमाणपत्र नंतरही चौकशी कशी ?- अभयसिंह चौगुले
बांबवडे : तालुका बांधकाम विभागाने कडवे येथील बांधकामाला गुणवत्ता तपासणी परीक्षेत गुणवत्ता योग्य असल्याचे जाहीर करूनही, या कामाच्या चौकशीची आदेश कसे दिले गेले ? असा प्रश्न अभयसिंह चौगुले यांनी उपस्थित केला. यावर सभापती आणि उपसभापती यांनी सांगितले कि, जर गुणवत्ता योग्य असेल तर चौकशीत ते निष्पन्न होईलच.मग चौकशी अंती बिल देयक अदा करण्यास आमची हरकत नसेल, असेही श्री अमरसिंह खोत यांनी सांगितले.

यावेळी शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांनी सांगितले कि, विद्यामंदिर करंजफेण च्या शिक्षिका मनीषा गजानन कराळे मूळ राहणार हिंगोली येथील असून,त्यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या पश्चात शिक्षिका मनीषा कराळे यांच्या पतींना १ लाख ५० हजार रुपयांचा निधी जमा केला असून,त्याचा धनादेश सभापती,उपसभापती आणि सदस्य यांच्याहस्ते मासिक सभेत श्री गजानन कराळे यांना सुपूर्द केला. यानंतर १९ केंद्रप्रमुख आणि अध्यापक जागा २०२३ सालापासून रिक्त आहेत. त्यासाठी सभागृहाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. दरम्यान जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी १ ली च्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा घरफाळा माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री सुतार यांनी सांगितले.
दरम्यान रमाई आवास योजना बंद झाली असून, त्यांचे रूपांतरण प्रधानमंत्री आवास योजनेत करण्यात आले असून, त्या माध्यमातून रमाई च्या लाभार्थ्यांना प्रधान मंत्री आवास योजनेतून लाभ घेता येईल.

दरम्यान १५ वा वित्त आयोग अंतर्गत ४४ कोटी ८० लाख निधी मंजूर झाल्याचे सुद्धा शाखा प्रमुखांनी सांगितले.
दरम्यान वीज वितरण कंपनीचे कुंभार यांनी सौर उर्जा बाबत सांगताना, ५ हजार रुपये भरून देखील आपल्यला सौर उर्जा पॅनेल बसवता येईल. अधिक माहितीसाठी वीज वितरण कार्यालयाला भेट देवून नागरिकांनी माहिती घ्यावी, असे सांगितले.
सुरेश पोवार यांनी मांजरे प्राथमिक आरोग्य वर्धिनी बाबत बोलताना सांगितले कि, येथील गणेश कुंभार आरोग्य सेवक सहा महिन्यांपासून गैरहजर आहेत. याबाबत कारवाई करण्याचे आवाहन केले.
ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या शाखाप्रमुखांनी सांगितले कि, १०५ योजनांपैकी ३३ गावातील कामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी २६ योजना गावांना लोकार्पण करण्यात आल्या आहेत.

दरम्यान गटविकास अधिकारी मंगेश कुन्चेवार यांनी पुढील मासिक सभेस सर्व खात्याच्या शाखाप्रमुखांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
यावेळी सदस्य राजेश पाटील, सदस्या माधुरी पाटील, लक्ष्मी पाटील, डॉ.धनश्री जयवंत पाटील,यांच्यासह विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी उपसभापती अमरसिंह खोत यांनी सांगितले कि, सर्व शाखाप्रमुखांनी इथं झालेल्या संवादात काही वेळा सदस्यांचा आवाज चढतो,पण तो तालुक्यातील जनतेसाठी असतो. तेंव्हा त्या गोष्टींचा कोणीही राग माणू नये. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले व मासिक सभा खेळीमेळीत झाल्याचे जाहीत केले.
