राजकीयसामाजिक

पूरपरिस्थितीत हक्काने संपर्क साधा- सभापती श्री विजय खोत


शाहुवाडी प्रतिनिधी : गेले दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे शाहुवाडी तालुक्यात पूर परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पावसाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन शाहुवाडी पंचायत समिती चे सभापती श्री विजयराव खोत यांनी तालुकावासीयांना केले आहे. दरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी हक्काने तत्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन श्री खोत यांनी केले.


शाहुवाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत आहे. यामुळे तालुक्याच्या नद्यांच्या पात्रात वाढ होत आहे. यामुळे नद्यांना पूर आला आहे. दरम्यान नदी काठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.


दरम्यान अगोदर कोरोना चा प्रकोप आणि आता निसर्गाचा फटका तालुकावासीयांना बसत आहे.अशा परिस्थितीत नागरिकांनी आपत्कालात मदतीसाठी सभापती श्री विजयराव खोत यांना ९९२२८१६८९६ या क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहन श्री खोत यांनी प्रसिधीपत्रकाद्वारे केले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!