प्रशासन निर्मितीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्वाची – श्री शरद पाटील
आंबा प्रतिनिधी : पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून, प्रशासकीय कामकाजातील अनेक घटना पत्रकारांमुळे समोर येतात. योग्य प्रशासन निर्माण करण्यात पत्रकारांची भूमिका महत्वाची असते. असे मत प्रतिपादन भारतीय शिक्षण सेवा प्रसारक .मंडळाचे सचिव शरद पाटील यांनी केले.

येथील पत्रकार सुभाष पाटील यांना जिल्हा परिषद चा पत्रकारांच्यासाठी असलेला यावर्षीचा आचार्य अत्रे पुरस्कार त्यांना मिळाला होता. या निमित्त त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री शरद पाटील बोलत होते.

गजापूर तालुका शाहुवाडी इथं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शरद पाटील पुढे म्हणाले कि, सुभाष पाटील यांनी गजापूर पंचक्रोशीत आपल्या लेखणी च्या माध्यमातून योगदान दिले आहे.

यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयसिंह पाटील यांच्या हस्ते पत्रकार सुभाष पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी हायस्कूल चे मुख्याध्यापक एच.एस.पाटील, अलीसाब प्रभुळकर, शिराज प्रभूळकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान पत्रकार सुभाष पाटील यांच्या हस्ते गजापूर हायस्कूल, बाजीप्रभू विद्यामंदिर गजापूर, प्राथमिक शाळा दिवानबाग.येथील शाळेत देखील पत्रकार सुभाष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पत्रकार सुभाष पाटील म्हणाले कि, पत्रकारीतेमध्ये अनेक अडचणी असतात, हे व्यवसाय म्हणून करण्यापेक्षा सामाजिक छंद म्हणून करणे, गरजेचे आहे.
कार्यक्रमास ग्रामसेवक प्रमोद गायकवाड, यशवंत कांबळे, सागर कांबळे, गणपत चव्हाण, आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन टी.टी. सुतार यांनी केले, तर आभार सचिन चव्हाण यांनी मानले.