मलकापूर-आंबा रस्त्यांवर पडलेले खड्डे भरा-यासाठी रासप चे ” भिक मांगो ” आंदोलन संपन्न
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर मलकापूर ते आंबा या राज्यमार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी भिक मांगो सहित रास्ता रोको आंदोलन राष्ट्रीय समाज पक्ष च्या वतीने करण्यात आले.


रासप चे तालुका अध्याक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मदत देण्याची मागणी देखील या आंदोलनात करण्यात आली.


कोल्हापूर-रत्नागिरी हा महामार्ग सतत वर्दळीचा झाला आहे. यामुळे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेकजन यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.
एका महिलेला या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे होते. परंतु अद्यापही त्या कुटुंबाकडे शासनाने पाहिलेले नाही. याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.


यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर नागरिकांकडून भिक मागून निधी गोळा करण्यात आला. हा निधी संबंधित शासकीय विभाग, ठेकेदार यांना देणार असून,यातून तरी शासनाला जाग येईल ,अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान अपघात झालेल्या महिलेची चिमुकली मुलगी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाली होती. चिमुकल्या मुलीकडे पाहून उपस्थितांना गहिवरून आले.


तरी संबंधित विभागाने तातडीने खड्डे भरावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देखील रासप च्यावतीने देण्यात आला.
यावेळी सुमित आपटे, महेश सावंत, गणेश गोसावी, सुशांत सोने, संजय जाधव, पांडुरंग पांढरे, महेश मोरे, सलीम मालदार, रघुनाथ कांबळे, अथर्व मिरजे, राहुल जाधव, तसेच मृत पावलेल्या महिलेची मुलगी सबिया अहमद साहेब देवळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.