मार्ग न निघाल्यास रास्ता रोको – महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाहुवाडी
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : शाहुवाडी तालुक्यातील कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावरील जुळेवाडी खिंडीतील चक्री वळणावर खूपच अरुंद जागा आहे. याठिकाण चे संरक्षण बॅरीकेट तुटून पडले आहेत. या ठिकाणी अनेकवेळा अपघात होवून जीवित आणि वित्त हानी झालेली आहे. तरी महामार्ग कार्यालय याकडे कानाडोळा करीत आहे. यापुढे आठ दिवसांपर्यंत महामार्ग कार्यालयाने त्वरित उपाय योजना जर केली नाही, तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाहुवाडी च्यावतीने, शाहुवाडी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग कार्यालय , प्रकल्प संचालक कोल्हापूर यांना देण्यात आले आहे.

सदर चे निवेदन मनसे चे तालुका उपाध्यक्ष प्रवीण कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी सहकार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश तांदळे, कामगार सेना तालुकाध्यक्ष सुरज गोसावी, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब कदम व अनेक मनसे चे कार्यकर्ते उपस्थित होते.