सामाजिक

मुळव्याध तपासणी शिबीर फक्त आज आणि उद्या ३० मार्च पर्यंतच


बांबवडे : भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल च्या वतीने सुरु असलेले मुळव्याध तपासणी शिबीर लवकरच संपणार आहे. तेंव्हा इच्छूक रुग्णांनी त्वरित संपर्क साधावा, असे भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल च्यावतीने सांगण्यात येत आहे.


याबाबत भास्कर आयुर्वेद चे डॉक्टर दिलखुष तांबोळी एसपीएस न्यूज शी बोलताना म्हणाले कि,
आपल्या देशात शेकडो वर्षांपासून आयुर्वेदाला आरोग्याबाबत सर्वाधिक महत्व देण्यात आले आहे. कारण आपलं शरीर खऱ्या अर्थाने आयुर्वेद तत्वावर जिवंत आहे. सध्या विज्ञान खूप प्रगती करीत असून, सत्वर उपायांची गरज भागवत असताना, आपल्याला आयुर्वेदाचा विसर पडू लागला आहे. परंतु आपल्या आयुष्यात आयुर्वेदाला सर्वाधिक महत्व आहे, हे आपली संस्कृती आहे.
म्हणूनच आयुर्वेदाला सर्वाधिक महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच कोणतीही शस्त्रक्रिया करण्या अगोदर आमच्याशी संपर्क साधा. जसे पाठीच्या मणक्याचे दुखणे, व त्यावर करावी लागणारी शस्त्रक्रिया यासाठी अगोदर भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल शी संपर्क साधा, जेणेकरून या शस्त्रक्रिया न करता, आपले दुखणे बंद करता येईल. अशाच पद्धतीने संधिवात, आमवात, गाऊट, गुडघेदुखी, कंबर दुखी, सोरायसिस, मुल न होणे (वंध्यत्व ), अशा अनेक आजारांवार आपल्याकडे हमखास उपचार केले जातात. असेही भास्कर हॉस्पिटल चे डॉ. दिलखुष तांबोळी ( एम.डी. आयुर्वेद गोल्ड मेडलीस्ट ) यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.


तेंव्हा शिबिराची सांगता ३० मार्च ला होत आहे. त्वरित संपर्क करा. आणि नाव नोंदवा . संपर्क क्रमांक ७२७६००९०५१. भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल बांबवडे ग्रामपंचायत समोर असलेल्या गाडवे बिल्डींग मध्ये आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!